AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bird Flu : बर्ड फ्लू कल्याणमध्ये! ठाणे, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगण्याची गरज, यवतमाळमध्येही 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

कल्याणमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.

Bird Flu : बर्ड फ्लू कल्याणमध्ये! ठाणे, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगण्याची गरज, यवतमाळमध्येही 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 19, 2021 | 8:33 PM
Share

कल्याण : देशभरात कोरोनाचं गहिरं संकट असताना आता बर्ड फ्लूचा धोकाही वाढतोय. कारण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या नष्ट कराव्या लागल्या आहेत. आता कल्याणनजिकच्या वडवलीमध्येही दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याचे नमुने पशुसंवर्धन विभागाकडून तपासण्यात आले. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. उद्यापासून परिसरातील सर्व कोंबड्या मारण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांनी तशी माहिती दिली आहे. (Bird flu kills chickens in Kalyan, 2,000 chickens die in Yavatmal)

यवतमाळमध्ये 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

यवतमाळ शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या रातचांदना इथं एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच प्रशासनानं राजचांदना गावात धाव घेत मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. 2 हजार कोंबड्या अचानक मेल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म मालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

रातचांदना इथल्या महंमद अमीन सोळंकी हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरु केला. त्यातून त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत होती. मात्र, अचानक 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं अमीन यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर अमीन यांनी पशुसंवर्धन विभागाला याची माहिती दिली. अचानक कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मोठा खड्डा करुन शास्त्रोक्त पद्धतीनं मृत कोंबड्या नष्ट करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

बर्ड फ्लूची लक्षणे :

कफ, अतिसार, ताप, श्वसन समस्या, डोकेदुखी, स्नायू वेदना, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि अस्वस्थता या सारख्या समस्या ‘बर्ड फ्लू’ची लक्षणे आहेत. जर, आपल्याला देखील यापैकी कोणती लक्षणे जाणवत असतील, तर दुसर्‍या एखाद्याच्या संपर्कात येण्यापूर्वी डॉक्टरांची भेट घ्या.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्लूचे बरेच प्रकार आहेत. परंतु, H5N1 हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना 1997मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता (Bird Flu symptoms, Causes, treatment and precaution).

H5N1 हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस 165ºF वर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. परंतु, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची किंवा उकडून खाऊ नयेत.

संबंधित बातम्या : 

Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird flu kills chickens in Kalyan, 2,000 chickens die in Yavatmal

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र