AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? शरद पवार एका वाक्यात म्हणाले…

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आता तयारीला लागलेली दिसत आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, यावेळी शरद पवार यांनी अजितदादा भाजपमध्ये गेल्यावर त्यांची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का असं विचारण्यात आलं, यावर पवारांनी काय उत्तर दिलं जाणून घ्या.

अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? शरद पवार एका वाक्यात म्हणाले...
| Updated on: Jun 15, 2024 | 3:53 PM
Share

महायुतीमध्ये गेलेल्या अजित पवार यांची घुसमट होत असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक जागा अजित पवार यांची आली होत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका बसल्याचंही बोललं जातं. राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचा दरारा होता तो कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतं. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असा सवाल केला गेला. यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. साधी गोष्ट आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असं विचारल्यावर त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. आम्ही का सांगावं, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले, याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. या सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असंही शरद पवार म्हणाले.

मविआमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ नाही- चव्हाण

मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. आम्ही एकत्र चर्चा केली आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे. मागच्या विधानसभेचा आधार घेऊन जागा वाटप होईल. आमच्या कोणताही किंतू परंतु नाही, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.