AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…

"उबाठा सेना आता बास झालं. येणाऱ्या निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना आपण मतदान करायचं आहे. मला ते बोलावतील की माहिती नाही. पण स्वइंजिन पोहचवायचं आहे", असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेची शिवडी मतदारसंघापुरता महायुती होताना दिसत आहे.

महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण...
आशिष शेलार आणि राज ठाकरे
| Edited By: | Updated on: Nov 05, 2024 | 10:11 PM
Share

मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण निवडणूक लढवेल? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. कारण भाजप नेते आशिष शेलार यांनी आजच्या शिवडी येथील मेळाव्यात मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजय चौधरी या मतदारसंघातून दोन वेळा जिंकून आले आहेत. असं असलं तरी आता अजय चौधरी यांना बाळा नांदगावकर यांचं कडवं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप ठाकरे गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात मोठा राजकीय गेम खेळला आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार अजय चौधरी यांच्या पराभवासाठी भाजपने राज ठाकरे यांचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा जाहीर करत असताना भाजपचा केवळ शिवडी या एकमेव मतदारसंघापुरता मनसेला पाठिंबा असेल, महाराष्ट्रात नसेल, असंदेखील आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केलं.

“मनसेला आमचा पाठिंबा हा महाराष्ट्रात नाही तर केवळ शिवडी मतदारसंघापुरता मर्यादीत आहे. आपण इथं खूप वेळापासून बसलेला आहात. पाणी देखील नाही. आपणही विरोधकांना इथं पाणी पाजल्याशिवाय शांत बसायचं नाही. आज शिवडीतील जनतेसमोर आपल्या भूमिकेबद्दल खुलासा झाला पाहिजे. शिवडी विधानसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार द्यायचा होता. पण इथे आपला उमेदवार नाही. आपले मुंबईतील 36 पैकी 35 ठिकाणी उमेदवार आहेत. इथे उबाठा आणि मनसेचे उमेदवार आहेत. मग आपण काय करायचं? मतदान करणाऱ्या सर्वांच्या डोक्यात सुरु आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

‘अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही’

“ज्यांना या विधानसभेचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी 2014 आणि 2017 चा अभ्यास करायला पाहिजे. त्यात आम्ही 10 दिवसात अनेक मत घेऊ शकलो. नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आपण यश घेतलं. आताही भाजपा जी भूमिका घेईल त्यातच यश निश्चित आहे. आम्हाला सर्व विचारत आहेत, साहेब एकदा भूमिका सांगा. गावाकडे लग्न सुरु आहे आणि आम्हाला नाचता येईना. एका अपक्ष उमेदवार सोशल मीडियावर भाजपचे समर्थन आहे, असं दाखवत होता. त्याला आपला पाठिंबा नाही, परस्पर भूमिका घेतली. पण अरे बाबा तू बोलशील की नाही? कोणतीही चर्चा न करता पक्षाची भूमिका कशी देणार? अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही”, असं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं.

‘ही भूमिका केवळ शिवडीपुरता मर्यादीत’

“मी आता फक्त शिवडीपुरता बोलत आहे. ते राज्यभर घेऊन जाऊ नका. मी माहीमबद्दल बोललो आणि महाराष्ट्रभर घेऊन गेले. आता भूमिका केवळ शिवडीपुरता मर्यादीत असेल. एक तर अजय चौधरी नाहीतर, बाळा नांदगावकर आणखी काही पर्याय तर नाहीत. नोटा आपला विषय नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे. विचारधारेवर आपल्याला पुढे चालायचं आहे. काही जुने मित्र आहेत. त्यांनी आपल्याला संपर्क केला नाही. पण उद्धवजी तुम्ही दगाबाजी केलीत. महाराष्ट्राच्या इतिहासात दगाबाज म्हणून नोंद ठेवायची तर उद्धवजी तुमचं नाव पहिले येईल”, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलारांचा ठाकरेंवर घणाघात

“उद्धवजी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला गेले. पण शिवडीतील वारकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी पंढरपूरला जाऊनही पांडुरंगाच्या पायाला हातही लावला नाही. तुळशीची माळ माझ्या गळ्यात पडली तर स्वर्ग सुखाचा आनंद होतो पण उद्धवजी यांनी ती माळ स्वीकारली नाही. कोरोना काळात उद्धवजी यांनी मंदिर बंद केली. गर्दी होऊ नये म्हणून केली मान्य आहे. पण रेशन दुकानात खडूने गोल करून लोक रेशन घेत होते. मग दर्शन का घेऊ शकत नव्हते? आमची तुमच्या सोबत जिवंत युती होती. काँग्रेसने सावरकरांचा वारंवार केलेला अपमान उद्धवजी त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत. पालघर साधू हत्यांमध्ये तुम्ही साधी केस CBI कडे देऊ शकला नाहीत. शर्जील उस्मानीसमोर पायघड्या घालणारे तुमचे सरकार”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

‘चाटुगिरी केलीत म्हणून तुम्ही आता भोगताय’

“अजय चौधरी यांना तिकीट दिलं. मग सुधीर साळवी समर्थक नाराज झाले. हे सर्व सुरु होतं. तो माझा मुद्दा नाही. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कोरोना काळात गणेशोत्सव हे होऊ देत नव्हते. पण मी मिटिंगला सांगितलं भक्तांना देवापासून तोडू नका. सुधीर साळवी तुम्ही भोगताय ना तिकीट का मिळालं नाही हे? मी बोलणार नाही. पण तुम्ही त्यावेळी चाटुगिरी केलीत म्हणून तुम्ही आता भोगताय. त्यावेळी तुम्ही उद्धव ठाकरे यांना काय वाटेल त्याचा विचार केलात, त्याचे भोग साळवीने भोगलेत. आता 23 तारखेला अजय चौधरी भोगतील”, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.