AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही अक्षरशः ठाकरेंवर तुटून पडले; कारण होतं…

ज्यांनी रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली काळंपांढरं करण्याचं ज्यांनी काम केले आहे. त्यांची आता ती दुकानं बंद होणार आहेत म्हणून त्यांच्या पोटाता भीतीचा गोळा आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही अक्षरशः ठाकरेंवर तुटून पडले; कारण होतं...
| Updated on: Jan 19, 2023 | 10:43 PM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. मेट्रो आणि विकास कामांची उद्घाटनप्रसंगी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार बॅटिंग करत उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले. 2019 ची निवडणुकीची आठवण सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर कशी बेईमानी केली, त्याचे उदाहरण दिले.

तर दाओस दौऱ्यामध्ये परदेशात मोदी भक्त कसे भेटले आणि हम उनकेही लोग है असं सांगत आपणही नरेंद्र मोदी यांचीच माणसं कशी आहोत हे सांगत त्यांनी मुंबईतील रस्त्याच्या टीकेवरून त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण नरेंद्र मोदी यांची माणसं कशी आहोत हे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या गोटात भीती कशी पसरली आहे तेही सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे उदाहरण देत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ज्यांनी रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली काळंपांढरं करण्याचं ज्यांनी काम केले आहे. त्यांची आता ती दुकानं बंद होणार आहेत म्हणून त्यांच्या पोटाता भीतीचा गोळा आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात नवीन आलेले सरकार सहा महिन्यात एवढे काम करू शकते तर पुढील सहा महिन्यात आणि किती काम करेल याचा विचार विरोधक करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून टीका केली जात आहे असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत ज्यांनी वीस वीस वर्षे ज्यांनी राज्य केले त्यांनी फक्त आपली फिक्स डिपॉजिट केली आहेत. त्यामुळे इतक्या वर्षातही त्यांनी कधी मुंबईकरांना पिण्याचे पाणी दिले नाही असा टोला त्यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.