AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्येच्या माहेरघरात अघोरी प्रकार, मूल होत नाही म्हणून…

पुण्यामध्ये मुलबाळ होत नसल्यामुळे अघोरी पूजा करून त्यामध्ये मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके यांचा वापर करण्यात आला आहे.

विद्येच्या माहेरघरात अघोरी प्रकार, मूल होत नाही म्हणून...
| Updated on: Jan 19, 2023 | 9:21 PM
Share

पुणेः महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या भागात अंधश्रद्धेच्या नावाखाला काहीही प्रकार सुरू आहेत. श्याम मानव आणि बागेश्‍वर ऊर्फ धीरेंद्र महाराज यांचे प्रकरण ताजे असतानाच पु्ण्यातही एक अघोरी प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खावू घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्यामुळे राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करत आयोगास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुण्यात हा प्रकार घडल्यानंतर समुपदेशक आणि प्रकल्प अधिकारी अंजनी काकडे यांच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेत या प्रकरणाचा तपास सिंहगड पोलिसांनी करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अंजनी काकडे यांनी सांगितले आहे की, पुण्यामध्ये मुलबाळ होत नसल्यामुळे अघोरी पूजा करून त्यामध्ये मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके यांचा वापर करण्यात आला आहे.

त्यानंतर हाडाची पावडर करून विवाहितेला जबरदस्तीने खायला लावली आहे. तसेच स्मशानभूमीतून हाडे, राख आणून त्याची पूजा करून ती राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यास दिल्याची घटना सोशल माध्यमाद्वारे प्रसारित झाली होती.

त्यामुळे या अघोरी प्रकल्पाची माहिती राज्य महिला आयोगाने घ्यावी अशी मागणी अंजली काकडे यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेत महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात हा प्रकार घडल्या नंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंजली काकडे यांनी सोशल मीडियाद्वारे हा अघोरी प्रकार व्हायरल झाल्यानंतर या प्रकारची दखल महिला आयोगानेही घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.