AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत घेतलल्या खबरदारीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray calls Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे.

Corona | राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 23, 2020 | 2:32 PM
Share

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत घेतलल्या खबरदारीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray calls Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे. थोडा उशीर झाला, पण सरकारने योग्य पावलं उचलली आहेत, असं राज ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं. (Raj Thackeray calls Uddhav Thackeray)

राज ठाकरे म्हणाले, “पहिल्यांदा मी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन करतो. थोडा उशीर झाला, पण केंद्र आणि राज्य सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं. आपल्याकडच्या सरकारी यंत्रणा, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचा अभिनंदन करतो. थोडा उशीर झाला, पण सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलणं केलं. सगळं बंद आहे पण डोमेस्टिक एरलाईन बंद करण्याची मागणी केली. त्यांनी करणार असल्याची माहिती दिली“.

मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, त्यांनाही काही सूचना केल्या आहेत. सरकार त्यांच्या परीने योग्य यंत्रणा राबवत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

ज्यांनी डॉक्टरवर हात उचलले त्यांना कळलं असेल की डॉक्टर किती महत्वाचे आहेत. त्यांना जाणीव झाली असेल की त्यांनी काय चूक केली. काही मूठभर लोकांना गंभीर्य कळत नाही. कालचा बंद झाला तो भारत बंद नव्हता ती टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही तर सरकारला गंभीर पावलं उचलावी लागतील, असं राज ठाकरे म्हणाले.

दुसऱ्या दिवशीच वाहने रस्त्यावर दिसत आहेत. मुंबईतील मुलुंड चेक नाक्याला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. का करताय हे सगळं? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

परदेशी डॉक्टरांनी सांगितले की इटली, चीन, अमेरिकेची जी अवस्था झाली, तसं झाल्यास भारतात 50 टक्के लोकांना म्हंणजे 75 लाख लोकांना होऊ शकतो. इतका कोरोना पसरला तर यंत्रणा आपल्या आहेत का? काल थाळीनाद, घंटानादला लोक जत्थेच्या जत्थे बाहेर होते काय म्हणावं लोकांना? असं राज ठाकरे म्हणाले.

कोरोना आधीच मागे लागलाय. हात जोडून विनंती आहे की प्रकरण सहज घेऊ नका. 31 तारीख सरकारने सांगितली असली तरी लोक ऐकत नाहीत, त्यामुळे जमावबंदीची तारीख आणखी पुढे जाऊ शकते. हातावरच्या पोटाच्या लोकांनाही थोडी कळ सोसावी लागेल. जर युद्ध झालं असतं तर काय केलं असतं? सध्या आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत, ते सुद्ध एकप्रकारचं युद्धच आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.

सरकारलाही कदाचित माहीत नसेल की आकडा नेमका किती असेल. घरी बसलो की बाहेरचे रुग्ण शोधणे सरकारलाही सोपे जाईल. हात जोडून विनंती की घरी बसा, आपल्यासाठीच सगळं सुरू आहे. डॉक्टर, जीवावर उदार होऊन बाहेर आहेत. डॉक्टर, पोलीस यांनाही परिवार आहे. पोलिसांशी हुज्जत घालतात लोक, त्यांना शरम नाही वाटत.

लोकांना जाणीव आहे. पण मूठभर लोकांना विनंती आहे की पुढे असं काही करू नका. जर समज येत नसेल तर पोलिसांना कायदा कठोर करावा लागेल.

कंपन्यांनी मदत करावी

कंपन्यांना मदत करावी लागेल, त्यांनी कामगारांचे पगार कापू नयेत . हातावरच्या पोट असेलल्यांनाही मदत करावी. रेस्टरन्ट बंद करा पण किचन सुरू ठेवा. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे , स्टॅम्प मारलेली लोक बाहेर पडत आहे त्यांनाही गंभीर्य नाही.

संबंधित बातम्या

दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती

Lock Down | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला  

Corona | वेल्हा परिसरातील तब्बल 26 गावं क्वारंटाईन, महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके