AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मुंबईच्या उच्चभ्रू रुग्णालयातील जागा संपली; रुग्णांवर व्हरांड्यात बेडस् टाकून उपचार

हा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयातील व्हीडिओ असल्याचे सांगितले जात आहे. | Coronaviurs situation in Mumbai

VIDEO: मुंबईच्या उच्चभ्रू रुग्णालयातील जागा संपली; रुग्णांवर व्हरांड्यात बेडस् टाकून उपचार
मुंबईच्या उच्चभ्रू रुग्णालयातील अवस्था
| Updated on: Apr 11, 2021 | 8:44 AM
Share

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आता मुंबईसारख्या शहरातील आरोग्य यंत्रणाही कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कोरोना रुग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये बेडस शिल्लक राहिलेले नाहीत. मात्र, अनेकांना ही गोष्ट सांगूनही खरी वाटत नाही. सरकार उगाच परिस्थितीचा बागुलबुवा करत असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुंबईतील एका नामांकित रुग्णालयातील परिस्थिती पाहून तुम्हाला या भयाण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. (patients taking treatment in lift lobby at leading hospital in Mumbai)

कालपासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयातील व्हीडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी बेडस् संपल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने लिफ्टने ये-जा करण्याचा मार्ग असलेल्या लॉबीत खाटा टाकून उपचार करायला सुरुवात केली आहे. या व्हीडिओत सलाईन लावलेले अनेक रुग्ण दिसत आहेत.

त्यामुळे ही मुंबईतील उच्चभ्रू रुग्णालयांची अवस्था असेल तर सरकारी आणि इतर सामान्य रुग्णालयांमध्ये काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. सध्या पुणे, नाशिक या शहरांमध्ये सरकारी रुग्णालये आणि कोव्हिड सेंटर्समध्येही उपचारासाठी जागा उरलेली नाही. व्हेंटिलेटर्स बेडस आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे.

या तुलनेत मुंबईत प्रत्येक दिवशी जवळपास 10 हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांपेक्षा हा आकडा कितीतरी मोठा आहे. त्यामुळे आगामी काळात हीच परिस्थिती राहिल्यास मुंबईसारख्या शहरात रुग्णांना मिळेल त्या जागेत उपचार करुन घेण्याची वेळ ओढावली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती?

मुंबईत गेल्या 24 तासांत 9 हजार 327 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या मात्र वाढली आहे. दिवसभरात 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमधील 30 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 34 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.

मुंबईत सध्या 91 हजार 108 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झालाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपला आहे.

(patients taking treatment in lift lobby at leading hospital in Mumbai)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.