AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार, मुंबईकरांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन तयार; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

मुंबईसाठी हा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यानंतर हा रोड पुढे वर्सोव्याला जोडला जाईल आणि त्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रकल्प देखील आम्ही पुढे नेत आहोत", असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार, मुंबईकरांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन तयार; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2024 | 5:18 PM
Share

CM Ekanth Shinde Big Action Plan : पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचा उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार होणार आहे. दक्षिण मुंबईपासून वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, वेगवान प्रवास आता या रस्त्यामुळे शक्य होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आता या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेशी संवाद साधला.

“आपण कोस्टल हायवे सुरु केलेला आहे. आता तर तो सिलिंकलाही जोडला आहे. यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचे अंतर अवघ्या दहा मिनिटात मुंबईकरांना गाठता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना अतिशय सुखकर आणि जलद प्रवास करण्याची संधी मिळेल. लोकांचा वेळ, इंधन वाचेल. तसेच प्रदूषणही कमी होईल. लोक घरी व कार्यालयात वेळेत किंवा लवकर पोहोचतील आणि घरी जास्त वेळ ही देऊ शकतील. मुंबईसाठी हा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यानंतर हा रोड पुढे वर्सोव्याला जोडला जाईल आणि त्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रकल्प देखील आम्ही पुढे नेत आहोत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

यानंतर आता भविष्यात मरीन ड्राईव्हपासून मुंबई वर्सोवा दोन ते तीन तासाचा अंतर 40 मिनिटात पार करता येणार आहे. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. आमचा महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या ब्रीजवरून पाहिलं तर विदेशात आल्यासारखं वाटतं. हा पूल बनवण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

मुंबई खड्डे मुक्त होईल

आम्ही या प्रकल्पात कोळी बांधवांची मागणी देखील पूर्ण केली आहे. या प्रकल्पात त्यांना न्याय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोळी बांधव गेले होते, त्याचा स्पेन वाढला पाहिजे आमच्या बोटी जाऊ शकत नाही या त्यांच्या मागण्या होत्या. मात्र त्यांनी याला नकार दिला. पण सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत आम्ही त्याला मान्यता दिली आणि यासाठीच लागणारा जास्तीचा वेळ वेगाने काम करून आम्ही पूर्ण केलं. पुढच्या दोन वर्षात जो ॲक्शन प्लॅन तयार केला आहे, त्याप्रमाणे मुंबई खड्डे मुक्त होईल. आरोग्य आणि वाहतूक कोंडीवर विविध योजना आपण करतोय, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

वेळेची मोठी बचत होणार

दरम्यान मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे उद्धाटन आज करण्यात आले. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं