AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक महाराष्ट्र सरकारने अखेर ऐकली, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी बातमी

कापूस उत्पादक शेतकरी आजच्या घडीला पुरेसा भाव मिळावा यासाठी हवालदिल झालाय. कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलनेदेखील केली जात आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक महाराष्ट्र सरकारने अखेर ऐकली, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी बातमी
| Updated on: Mar 17, 2023 | 6:36 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक ऐकली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी त्यावेळी दिलीय ज्यावेळी राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाला शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मानलं जातं. पण या सोन्याला दृष्ट लागली की काय? अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कापसाचा भाव सुरुवातीला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण हा भाव पुढे वाढण्याऐवजी अतिशय खाली आलाय.

कापसाचा भाव प्रतिक्विंटल अगदी साडेसात ते आठ हजारापर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकरी देखील चिंचेत पडले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कापूस घरात पडून आहे. आता भाव वाढेल, तेव्हा भाव वाढेल या आशेपयी शेतकरी वाट पाहत आहेत. याच आशेमुळे शेतकरी प्रचंड कर्जबाजारी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे घरात साठवून ठेवलेल्या या कापसामुळे घरातील इतरांना त्वचेचे विकार होण्याची वेळ आली. पण अद्यापही कापसाचे भाव वाढताना दिसत नाहीत. याउलट भाव खाली घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हाक सरकार कधी ऐकल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती सांगितली. खरंतर ते अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क विषयी सांगत होते. त्याचवेळी त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांनाही दिलासा मिळेल, अशी माहिती दिली. “या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रात अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्कला मान्यता दिली. मागच्या काळात हा प्रस्ताव आम्ही पाठवला होता. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. आता टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय. मागच्या काळात आपण अमरावतीत टेक्स्टाईल पार्कची इको सिस्टिम आधीच तयार केली आहे. एक मोठा टेक्सटाईल झोन तयार केला आहे. अनेक कंपन्या तिथे आल्या आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“आता हा टेक्सस्टाईल पार्क आल्याने दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षपणे असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे. त्यामुळे हा पार्क आल्यानंतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायादा मिळेल. खरं म्हणजे या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं फडणवीस म्हणाले.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.