AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सीमाप्रश्नावर फक्त राजकारण’, देवेंद्र फडणवीस यांचा भाजप सत्तेत असलेल्या कर्नाटक सरकारवर निशाणा?

"गेल्या साठ वर्षात त्यांनी भूमिका बदलेली नाही आणि आपणही बदलेली नाही. त्यामुळे ते फार नवीन सांगत आहेत किंवा शोध लावत आहेत, असंही नाहीय", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'सीमाप्रश्नावर फक्त राजकारण', देवेंद्र फडणवीस यांचा भाजप सत्तेत असलेल्या कर्नाटक सरकारवर निशाणा?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 10, 2022 | 8:31 PM
Share

मुंबई : “सीमाप्रश्न कालच तयार झालाय, आमचं सरकार सहा महिन्यांपूर्वी आल्यामुळे सीमाप्रश्न तयार झालाय, अशा प्रकारचे वक्तव्य देणं चाललेलं आहे. माझा प्रश्न असाय की, आपणही सरकारमध्ये अडीच वर्ष होता, काय केलंत? हा प्रश्न सोडवण्यासाठी काही काम केलं का?’, असे प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेवरदेखील प्रतिक्रिया दिली.

“ते (कर्नाटक सरकार) त्यांची भूमिका बदलणार नाहीत. आपण आपली भूमिका बदलणार नाहीत. यावर चर्चेतून मार्ग निघेल. किंवा सुप्रीम कोर्टात मार्ग निघेल. कारण गेल्या साठ वर्षात त्यांनी भूमिका बदलेली नाही आणि आपणही बदलेली नाही. त्यामुळे ते फार नवीन सांगत आहेत किंवा शोध लावत आहेत, असंही नाहीय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्राची बाजू कर्नाटकापेक्षा जास्त भक्कम आहे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे. ते न्यायालयात त्यांची बाजू मांडतील. आपण आपली बाजू मांडू. आम्ही बाजू मांडतोय यावरुनच समजतेय की आमती बाजू भक्कम आहे. पण ते न्यायालयाला ठरवू द्याना की कुणाची बाजू भक्कम आहे. या संदर्भात वाद निर्माण करण्याचं कारण काय?”, असा सवाल फडणवीसांनी केला.

“सीमाप्रश्नाचा वाद वर्षानुवर्ष चाललाय. हे प्रकरण गंभीर आहे. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा समस्येवर कधीच राजकारण झालेलं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो”, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“तिकडे कर्नाटकात आमच्या मराठी बांधवावर अन्याय झाला, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. सगळे एकत्रितपणे विधानसभेत एकत्रित येऊन प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. पण सध्या वातावरण निर्मिती करण्याचं कारस्थान सुरुय. सीमाप्रश्नच्या गंभीरतेपेक्षा राजकारण किती केलं जाईल, हा प्रयत्न सुरु आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक