AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक’, जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. त्या माध्यमातून पाकिस्तानचा प्रोपेगेंडा संपला आणि जगाने मान्य केलं की, कलम 370 हटवणं योग्य निर्णय आहे आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे", असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक', जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 08, 2024 | 5:29 PM
Share

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. हरियाणात भाजपला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेत येणार नाही, अशी सध्याची आकडेवारी सांगत आहे. निवडणूक निकालाच्या कलानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीरच्या निकालांवरही प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जितक्या जागांवर भाजप जिंकत आहे ती देखील ऐतिहासिक जीत असल्याचा दावा भाजपने केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

“मी केवळ हरियाणाचं बोलणार नाही. मला कुणीतरी विचारलं की, जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं, जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला. कारण जे लोकं म्हणत होते की, कलम 370 हटवल्यानंतर खून की नदीया बहेंगी, त्यांनी येऊन बघावं. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. जगभरातील मोठ्या देशांचे काऊन्सिल जनरल निरीक्षक म्हणून तिथे आले. त्यांनीदेखील सांगितलं की, इतक्या प्रमाणिक निवडणुका आम्ही कधी बघितल्या नाहीत. तशी निवडणूक आपण घेऊन दाखवली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सर्वात महत्त्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होतं की, भारताने जम्मू-काश्मीरमध्ये सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे. तिथे लोकशाही नाही. जम्मू-काश्मीर भारताचा भाग नाही, त्या ठिकाणी फेअर निवडणूक होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. त्या माध्यमातून पाकिस्तानचा प्रोपेगेंडा संपला आणि जगाने मान्य केलं की, कलम 370 हटवणं योग्य निर्णय आहे आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“जम्मू-काश्मीमध्ये सरकार कोणाचं बनतंय ते महत्त्वाचं नाही. आज जो जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे हे जगाने मान्य केलं आहे. हा भारताचा विजय झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ज्याप्रकारे जनतेने पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही विजयाने मातणार नाहीत. या विजयाने आणखी नम्रता शिकवली आहे. या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढवला आहे. जनतेची कामे करुन तुम्हाला वारंवार निवडणूक जिंकता येते हे सिद्ध झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा