AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या शाखांवरून वाद चिघळला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ठाकरे गटाने आता नरेश म्हस्के यांच्यावर टीका करताना त्यांनी शाखांची चावी घेऊन त्या लॉक करून जुन्या लोकाना त्यांनी बाहेर काढले आहे.

शिवसेनेच्या शाखांवरून वाद चिघळला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
| Updated on: Mar 08, 2023 | 12:09 AM
Share

मुंबईः ठाण्यात शिवसेनेच्या शाखांवरून आता वाद चिघळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून बळाचा वापर करून ठाकरे गटाच्या जुन्या कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून त्यांना ठाण्यातील काही शाखांमधून बाहेर काढले जाते आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी कृत्य करणे शोभणारे नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्ष चिन्ह आता आम्हालाच मिळाला आहे. त्यामुळे असणाऱ्या या शाखा आता आमच्याच आहेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर शिवसेनेकडून अन्याय केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाणे परिसरातील शाखा ताब्यात घेऊन ही शाखा आमचीच असल्याचे सांगत पोलिसांच्या मदतीने त्यानी जुन्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

नरेश म्हस्के यांच्यावर टीका करत ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सांगितले की आता शाखेवर भाड्याचे लोक आले असून त्यांनी आमच्याच शाखेतून आम्हाला बाहेर काढले आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेस म्हस्के यांनी शाखांची वाट लावली असल्याचा आरोप केला आहे. तर नरेश म्हस्के म्हणतात की,आता शिवसेना पक्ष आमचा आहे, चिन्ह आणि धनुष्य बाण आमचा त्यामुळे आता शाखामधून आमचेच लोक बसतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ठाकरे गटाने आता नरेश म्हस्के यांच्यावर टीका करताना त्यांनी शाखांची चावी घेऊन त्या लॉक करून जुन्या लोकाना त्यांनी बाहेर काढले आहे. त्यामुळे आता ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गटाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....