AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयातले कर्मचारी राज ठाकरेंच्या दरबारी

मुंबई : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातले कर्मचारीही राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचे दिसते आहे. ज्यांनी राज्यातल्या जनतेची कामं करावी, त्या कर्मचाऱ्यांनाच आता विविध मागण्यांसाठी लढावं लागतं आहे. मंत्रालयातील लॉटरी संचलनालयाच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. मंत्रालयात लॉटरी संचालन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या […]

मंत्रालयातले कर्मचारी राज ठाकरेंच्या दरबारी
फोटो सौजन्य - MNS Adhikrut चं ट्विटर हँडल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातले कर्मचारीही राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचे दिसते आहे. ज्यांनी राज्यातल्या जनतेची कामं करावी, त्या कर्मचाऱ्यांनाच आता विविध मागण्यांसाठी लढावं लागतं आहे. मंत्रालयातील लॉटरी संचलनालयाच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.

मंत्रालयात लॉटरी संचालन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या विभागात हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. मात्र, कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याने कायम स्वरुपी घेतलं जात नाही, ही प्रमुख समस्या या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली.

लॉटरी संचालन विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश ‘मॅट’ने दिले असतानाही, राज्य सरकार मात्र आदेश अंमलात आणण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांचा आहे. तेच त्यांनी राज ठाकरेंच्या कानावर घातलं.

कामावर कायम करावं, या प्रमुख मागणीसह मंत्रालयातील या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्याही राज ठाकरेंना सांगितल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला की, या सर्व मागण्यांसाठी स्वत: पाठपुरावा करेन. राज ठाकरेंच्या आश्वासनाने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही आपल्यासोबत कुणी असल्याचा दिलासा मिळाला आहे.

खरंतर, राज ठाकरे यांचा विधानसभेत एकच आमदार आहे. मात्र, तरीही सत्तेबाहेर राहून, रस्त्यावरील आंदोलनांमधून सत्तेवर वचक ठेवण्याचं काम राज ठाकरे उत्तमपणे करतात, जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडून ते कसे सोडवायचे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने त्यांनी थेट राज ठाकरेंना गाठून आपले म्हणणे मांडले.

आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज ठाकरे कसे हाताळतात, हे येत्या काळात कळेलच. मात्र, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्याच समस्या राज्य सरकार सोडवत नसल्याचेही या सर्व प्रकारातून समोर आले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.