AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिव्यांगांना सर्वांत मोठा दिलासा, राज्य सरकारचा तो निर्णय काय? दिव्यांग कल्याण मंत्र्यांचे थेट निर्देश

Disabled Grant Scheme: युडीआयडी अभावी बंद झालेले दिव्यांग अनुदानाबाबत मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी याविषयीचे निर्देश दिले आहे.

दिव्यांगांना सर्वांत मोठा दिलासा, राज्य सरकारचा तो निर्णय काय? दिव्यांग कल्याण मंत्र्यांचे थेट निर्देश
दिव्यांग अनुदान योजनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 16, 2026 | 12:53 PM
Share

Atul Save on Disabled Grant Scheme: राज्यातील दिव्यांगाना फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID) नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान आता थांबणार नाही. अनुदान बंद झाले असेल तर ते पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश मंत्री सावेंनी दिले आहेत. त्यामुळे दिव्यांगांना राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ मिळेल.

‘UDID’ कार्डसाठी मुदतवाढ

‘UDID’ कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थांबले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, १ एप्रिल २०२६ पूर्वी या योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना मुदतवाढ दिली आहे. संबंधित तहसीलदारांनी जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश ही मंत्री सावेंनी दिले आहेत.

का थांबले होते सामाजिक योजनांचे अनुदान?

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविल्या जातात. त्यात दिव्यांग लाभार्थी आहेत. सरकारने ‘युडीआयडी’ कार्ड अनिवार्य केले आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड नव्हते. त्या दिव्यांगांचे अनुदान थांबले. आचा १ एप्रिल २०२६ पूर्वी या योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना मुदतवाढ दिली आहे. संबंधित तहसीलदारांनी जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१५ जून २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांकडून स्वावलंबन पोर्टलद्वारे वैश्विक ओळखपत्रसाठी अर्ज करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. र्ज क्रमांक एसएएस पोर्टलवर अद्ययावत करण्यासह तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय, आधार कार्ड आणि युडीआयडी कार्ड मधील माहितीतील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनाही या योजनेचा नियमित आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या योजनांचा लाभ घेता येणार

संजय गांधी निराधार अनुदान योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?