AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पावसाने तोंडचा घास पळवला, पंचनामे कधी, मदत कधी? Video

राज्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अद्याप पंचनाम्यांनाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हाच प्रश्न निर्माण झालाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पावसाने तोंडचा घास पळवला, पंचनामे कधी, मदत कधी? Video
| Updated on: Mar 11, 2023 | 11:54 PM
Share

मुंबई : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय. द्राक्षबागा आडव्या झाल्या आहेत. पपई, केळीचंही मोठं नुकसान झालंय. पण राज्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अद्याप पंचनाम्यांनाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हाच प्रश्न निर्माण झालाय.

एकीकडे शेतमालाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय आणि दुसरीकडे तो अवकाळीच्या फेऱ्यातही सापडलाय. अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 4 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलं चांदोरी गावातील नितीन हिंगोले नावाचे शेतकरी पिढ्यानपिढ्या द्राक्षाची शेती करतात. पण यंदा त्यांचं द्राक्षाचं पीक अवकाळीने हिरावून नेलंय

जिथं प्रतिकिलो 60 ते 70 रुपये इतका भाव मिळाला असता, तिथं हा माल अवघ्या 10 रुपये किलोने विकण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. अशीच काही परिस्थिती राहूल हिंगोले यांची देखील आहे. गेल्या वर्षी देखील द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्याने सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेल्यावर्षीची देखील मदत त्यांना अजून मिळाली नाही.

अवकाळी पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. द्राक्ष माल अक्षरश: सडला आहे. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे कुठे सुरु झालेयत. तर कुठे अद्यापही प्रशासन बांधावर पोहोचलेलं नाही. अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पंचनाम्यांना सुरुवात झालीय. तर नाशिक, जळगाव, सांगलीत पंचनामे सुरु झालेले नाहीत..

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं सतराशे हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारीचं झालंय. पपई आणि केळीचं पीकही शेतकऱ्याच्या हातचं गेलंय. आसमानी संकटात शेतकरी भरडलाय. जीवतोड मेहनत करुन फुलवलेली शेती मातीमोल झालीय.. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्याला मदत देणं गरजेचं झालंय.

Follow Us
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.