AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पावसाने तोंडचा घास पळवला, पंचनामे कधी, मदत कधी? Video

राज्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अद्याप पंचनाम्यांनाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हाच प्रश्न निर्माण झालाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पावसाने तोंडचा घास पळवला, पंचनामे कधी, मदत कधी? Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 11, 2023 | 11:54 PM
Share

मुंबई : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय. द्राक्षबागा आडव्या झाल्या आहेत. पपई, केळीचंही मोठं नुकसान झालंय. पण राज्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अद्याप पंचनाम्यांनाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हाच प्रश्न निर्माण झालाय.

एकीकडे शेतमालाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय आणि दुसरीकडे तो अवकाळीच्या फेऱ्यातही सापडलाय. अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 4 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलं चांदोरी गावातील नितीन हिंगोले नावाचे शेतकरी पिढ्यानपिढ्या द्राक्षाची शेती करतात. पण यंदा त्यांचं द्राक्षाचं पीक अवकाळीने हिरावून नेलंय

जिथं प्रतिकिलो 60 ते 70 रुपये इतका भाव मिळाला असता, तिथं हा माल अवघ्या 10 रुपये किलोने विकण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. अशीच काही परिस्थिती राहूल हिंगोले यांची देखील आहे. गेल्या वर्षी देखील द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्याने सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेल्यावर्षीची देखील मदत त्यांना अजून मिळाली नाही.

अवकाळी पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. द्राक्ष माल अक्षरश: सडला आहे. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे कुठे सुरु झालेयत. तर कुठे अद्यापही प्रशासन बांधावर पोहोचलेलं नाही. अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पंचनाम्यांना सुरुवात झालीय. तर नाशिक, जळगाव, सांगलीत पंचनामे सुरु झालेले नाहीत..

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं सतराशे हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारीचं झालंय. पपई आणि केळीचं पीकही शेतकऱ्याच्या हातचं गेलंय. आसमानी संकटात शेतकरी भरडलाय. जीवतोड मेहनत करुन फुलवलेली शेती मातीमोल झालीय.. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्याला मदत देणं गरजेचं झालंय.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक