AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उठाव होणारच..! दोन्ही राजे आक्रमक, राज्यपालांच्या वक्तव्याचं सरकारकडे उत्तर मागणार…

राज्यपाल म्हणून तुमचा आदर असला तरी तुमच्या काळ्या टोपीखाली दडलेल्या गोष्टीबद्दल मी आदर बाळगू शकत नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

उठाव होणारच..! दोन्ही राजे आक्रमक, राज्यपालांच्या वक्तव्याचं सरकारकडे उत्तर मागणार...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 27, 2022 | 9:55 PM
Share

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून दोन्ही राजे आता आक्रमक झाले आहेत. उद्या उदयनराजे पत्रकार परिषद घेणार असून माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे. राज्यपालांवर कारवाई न झाल्यामुले सरकारचं त्यांना समर्थन आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही.

कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये.

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.

राज्यपालांनी इथं नाही कुठेच ठेवू नये, तर संभाजीराजे यांनी सरकारकडे विनंती करत असे राज्यपाल आपल्या राज्यात नको असं सांगितलं आहे.

तर साताऱ्याचे उदयनराजे यांनी 28 तारखेला पत्रकार परिषद घेत ते राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर त्यांनी काय कारवाई केली याची उत्तरं मागणार आहेत.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं भाजपकडून सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी करत त्यांच्यामुळे दोन्ही पक्षामध्ये वितुष्ठ येण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यपालांचा निषेध व्यक्त करून नाही तर त्यांची बॅग भरून त्यांना पाठवून देण्याची व्यवस्था यांनी केली पाहिजे होती अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यपाल म्हणून तुमचा आदर असला तरी तुमच्या काळ्या टोपीखाली दडलेल्या गोष्टीबद्दल मी आदर बाळगू शकत नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांनी उदयनराजेंना भंडावून सोडले होते.

तुमची भूमिका काय असा सवाल करून तुमच्या भूमिकाबाबत कन्फ्युजन असल्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणावरून आता दोन्ही राजे काय भूमिका घेतात याकडे मात्र साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन