AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाने विदर्भ-मराठवाड्याला झोडपले, मुंबई मात्र वेटिंग लिस्टमध्ये

मान्सून मराठवाडा विदर्भात बरसत असला तरी मुंबई शहर किंवा उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत. यामुळे उकाड्यापासून नागरिक त्रस्त झाले आहेत.

पावसाने विदर्भ-मराठवाड्याला झोडपले, मुंबई मात्र वेटिंग लिस्टमध्ये
| Updated on: Jun 23, 2019 | 10:03 PM
Share

पुणे : आज येणार उद्या येणार म्हणता म्हणता प्रचंड वाट पाहायला लावणारा मान्सून विदर्भ मराठवाड्यात दाखल झाला आहे. मराठवाड्यातील जालना, लासलगाव, अमरावती, चाळीसगाव, पुणे, सांगली, नागपूर यांसारख्या परिसरात पावसाने बरसायला सुरुवात केली. दरम्यान अवघ्या दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात मान्सून दाखल झाला. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह इतर ठिकाणी आज पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामालाही सुरुवात केली आहे.

राज्यात मराठवाड्यातील जालना, लासलगाव, अमरावती, चाळीसगाव, पुणे, सांगली, नागपूर या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर वर्धा जिल्ह्यासह समुद्रपूर, गिरड, हिंगणघाट, पुलंगाव, देवळी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. यामुळे शहरात काही ठिकाणी रस्ते तुंबले होते. तसेच काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. त्याशिवाय नाशिकमधील मालेगाव शहरातही मान्सूनचे जोरदार आगमन झाले. तसेच साताऱ्यातील कराड, सांगलीतील मिरज याठिकाणीही दमदार सरी कोसळल्या.

उशिरा दाखल झालेला मान्सून मराठवाडा विदर्भात बरसत असला तरी मुंबई शहर किंवा उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत. यामुळे उकाड्यापासून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्येही दिवसेंदिवस पाण्याचा साठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे.

महत्त्वाचं म्हणजे 22 ते 27 जून म्हणजेच पाच दिवसात राज्यात तब्बल शंभर टक्के पाऊस पडेल. विशेषत: पुण्यात या पाच-सहा दिवसात चांगला पाऊस पडेल. धरणातील पाणी साठा वाढू शकतो, असाही अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.