AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक निकालानंतर किती दिवसात शपथ घेणे बंधनकारक असतं? उशीर झाला तर काय होतं?

Maharashtra New CM : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची अद्याप घोषणा झालेली नाही. येत्या दोन दिवसात नाव जाहीर होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर ५ डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे. पण राज्यातील अनेक लोकांना असा प्रश्न पडलाय की. निवडणूक निकालानंतर किती दिवसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे बंधनकारक आहे. काय आहे याचं उत्तर जाणून घेऊयात.

निवडणूक निकालानंतर किती दिवसात शपथ घेणे बंधनकारक असतं? उशीर झाला तर काय होतं?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 29, 2024 | 5:19 PM
Share

Maharashtra CM candidate name: महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? त्याचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा होती. पण अजून तरी नाव जाहीर झालेलं नाही. सर्वोच्च नेतृत्व जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते. काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या 3 तास  बैठक झाली. तिन्ही नेते यावेळी उपस्थित होते. पण त्यानंतर ही मुख्यमंत्र्यांच्या नावावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.

पण तुम्हाला माहितीये का की, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक असते. असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आणि जर तसे झाले नाही तर? पुढे काय होते याचं उत्तर ही आज तुम्हाला आम्ही देणार आहोत.

नवीन मुख्यमंत्र्यांची शपथ किती दिवसांत घेणे बंधनकारक?

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष पांडे यांनी सांगितले की, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर किती दिवसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे बंधनकारक आहे. याबाबत भारतीय राज्यघटनेत कोणताही स्पष्ट नियम नाही, परंतु विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एका आठवड्यात साधारणपणे मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाते. किंवा शपथ घेण्याची प्रक्रियाही पूर्ण होते. अधिवक्ता आशिष पांडे यांनी सांगितले की, जर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर राज्यपाल सर्वाधिक मते मिळविणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास सांगतात. जर सर्वाधिक मते मिळविणारा पक्षही राज्यात सरकार स्थापन करू शकत नसेल, तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात.

राज्यपालांना कोणते अधिकार?

राज्यात सरकार स्थापनेला विलंब होत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. अशा परिस्थितीला ‘राज्य आणीबाणी’ किंवा ‘संवैधानिक आणीबाणी’ असेही म्हणतात.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 मध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा राष्ट्रपती, राज्यपालांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर किंवा राज्याचे सरकार घटनेच्या तरतुदींनुसार चालवले जात नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वैध असते, परंतु आवश्यक असल्यास ती 6 महिन्यांपासून जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत वाढवता येते.

महाराष्ट्रात सध्या तशी स्थिती नसली तरी लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल आणि त्यानंतर ५ तारखेला शपथविधी होईल असा दावा केला जातोय. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयारी नाहीत. त्यांना गृहमंत्रीपद हवं आहे असं देखील बोललं जातंय. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झालंय. राष्ट्रवादीकडून अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत.

Follow Us
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान