AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?

पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?
| Edited By: | Updated on: Jul 02, 2019 | 2:58 PM
Share

मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले आहेत, लाईफलाईन असणारी लोकल रेल्वे बंद पडली आहे आणि रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे. पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय. मुंबईतील ही परिस्थिती भयावह वाटत असली तरी यापूर्वीही असाच अनुभव मुंबईकरांनी घेतला होता. त्या तुलनेत हा पाऊस कमी असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.

हवामान खात्याच्या उपमहासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 25 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे. 5 जुलै 1974 रोजी 375 मिलीमीटर पाऊस पडला होता.त्यानंतर आज 375 मिली पाऊस पडलाय. इतिहासातला सर्वात धोकादायक पाऊस मुंबईने 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. त्यावेळी 944 मिली पाऊस झाला होता, ज्याने हजारो जीव घेतले होते.

26 जुलै 2005 रोजी काय झालं होतं?

मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे 5.5 बिलियनचं नुकसान झालं होतं.

कुर्ला, धारावी या परिसरात तर अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. आज सोशल मीडिया असल्यामुळे ट्वीट केलं तरीही बीएमसी आणि रेल्वेकडून मदत पाठवली जाते, पण तेव्हा फेसबुक आ ट्विटरचा वापर नव्हता. शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.

मुंबईकरांचं स्पीरिट नेहमीच पाहिलं जातं. दोन वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी पाऊस झाला होता तेव्हाही हा अनुभव आला होता. मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.