AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?

पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?
| Edited By: | Updated on: Jul 02, 2019 | 2:58 PM
Share

मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले आहेत, लाईफलाईन असणारी लोकल रेल्वे बंद पडली आहे आणि रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे. पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय. मुंबईतील ही परिस्थिती भयावह वाटत असली तरी यापूर्वीही असाच अनुभव मुंबईकरांनी घेतला होता. त्या तुलनेत हा पाऊस कमी असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.

हवामान खात्याच्या उपमहासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 25 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे. 5 जुलै 1974 रोजी 375 मिलीमीटर पाऊस पडला होता.त्यानंतर आज 375 मिली पाऊस पडलाय. इतिहासातला सर्वात धोकादायक पाऊस मुंबईने 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. त्यावेळी 944 मिली पाऊस झाला होता, ज्याने हजारो जीव घेतले होते.

26 जुलै 2005 रोजी काय झालं होतं?

मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे 5.5 बिलियनचं नुकसान झालं होतं.

कुर्ला, धारावी या परिसरात तर अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. आज सोशल मीडिया असल्यामुळे ट्वीट केलं तरीही बीएमसी आणि रेल्वेकडून मदत पाठवली जाते, पण तेव्हा फेसबुक आ ट्विटरचा वापर नव्हता. शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.

मुंबईकरांचं स्पीरिट नेहमीच पाहिलं जातं. दोन वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी पाऊस झाला होता तेव्हाही हा अनुभव आला होता. मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं.

Follow Us
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....