AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?

पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय.

26 जुलै 2005 रोजी मुंबईत किती पाऊस झाला होता?
| Edited By: | Updated on: Jul 02, 2019 | 2:58 PM
Share

मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले आहेत, लाईफलाईन असणारी लोकल रेल्वे बंद पडली आहे आणि रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे. पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय. मुंबईतील ही परिस्थिती भयावह वाटत असली तरी यापूर्वीही असाच अनुभव मुंबईकरांनी घेतला होता. त्या तुलनेत हा पाऊस कमी असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.

हवामान खात्याच्या उपमहासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 25 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस आहे. 5 जुलै 1974 रोजी 375 मिलीमीटर पाऊस पडला होता.त्यानंतर आज 375 मिली पाऊस पडलाय. इतिहासातला सर्वात धोकादायक पाऊस मुंबईने 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. त्यावेळी 944 मिली पाऊस झाला होता, ज्याने हजारो जीव घेतले होते.

26 जुलै 2005 रोजी काय झालं होतं?

मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे 5.5 बिलियनचं नुकसान झालं होतं.

कुर्ला, धारावी या परिसरात तर अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. आज सोशल मीडिया असल्यामुळे ट्वीट केलं तरीही बीएमसी आणि रेल्वेकडून मदत पाठवली जाते, पण तेव्हा फेसबुक आ ट्विटरचा वापर नव्हता. शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.

मुंबईकरांचं स्पीरिट नेहमीच पाहिलं जातं. दोन वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी पाऊस झाला होता तेव्हाही हा अनुभव आला होता. मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं.

Follow Us
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.
रोहित पवारांच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी बोलणं टाळलं?
रोहित पवारांच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी बोलणं टाळलं?.
विरोधकांना शिमगा करू द्या, आमचा भगवा...; भरत गोगावलेंचं मोठं विधान
विरोधकांना शिमगा करू द्या, आमचा भगवा...; भरत गोगावलेंचं मोठं विधान.
मुख्यमंत्र्यांनीही सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते; सुनील तटकरेंचं विधान
मुख्यमंत्र्यांनीही सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते; सुनील तटकरेंचं विधान.
भिवंडीतील निलेश डाईंग इमारतीला भीषण आग, मोठ्या प्रमाणावर नुकसान
भिवंडीतील निलेश डाईंग इमारतीला भीषण आग, मोठ्या प्रमाणावर नुकसान.
अटल सेतूवर धावत्या कारने घेतला पेट!
अटल सेतूवर धावत्या कारने घेतला पेट!.
जळगावात बायपासवर भीषण अपघात! 4-5 वाहनांची एकमेकांना धडक अन्...
जळगावात बायपासवर भीषण अपघात! 4-5 वाहनांची एकमेकांना धडक अन्....
संभाजीनगरात गरवारे स्टेडियमसाठी झाडांची कत्तल! वृक्षप्रेमींचा विरोध
संभाजीनगरात गरवारे स्टेडियमसाठी झाडांची कत्तल! वृक्षप्रेमींचा विरोध.
दादा सोबत नाही, पचवणं खूप कठीण जातंय; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
दादा सोबत नाही, पचवणं खूप कठीण जातंय; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट.
राज्यसभेत 2 खासदार असणं आमची गरज! राऊत स्पष्टच बोलले
राज्यसभेत 2 खासदार असणं आमची गरज! राऊत स्पष्टच बोलले.