AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत

महात्मा गांधींच्या भूमिकेवर आम्हीही टीका केली. पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि कार्य मोठं आहे. बलाढ्य ब्रिटिश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं आहे. गांधींचं नेतृत्व धैर्यशील आणि असामान्य आहे.

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत
खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई: महात्मा गांधींच्या (mahatma gandhi) भूमिकेवर आम्हीही टीका केली. पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि कार्य मोठं आहे. बलाढ्य ब्रिटिश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं आहे. गांधींचं नेतृत्व धैर्यशील आणि असामान्य आहे. गांधीजींना गोळी झाडण्यात आली. पण गांधी मेले नाहीत. तुम्हाला गोळी झाडायचीच होती तर पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मोहम्मद अली जिनांवर (Muhammad Ali Jinnah) गोळी का झाडली नाही. गोडसे खरा हिंदुत्ववादी असता, मर्द असता तर गांधींवर गोळी झाडली नसती, असं मत शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केलं आहे. गोडसेने गांधींऐवजी जिनांना गोळी घातली असती तर ती देशभक्ती ठरली असती. गांधींच्या हत्येला एवढी वर्ष उलटली आहेत. पण आजही देश शोकसागरात बुडालेला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नथुराम गोडसेच्या कृत्यावर आपली भूमिका व्यक्त केली. कोणी खरा हिंदुत्वावादी असता त्याने जिनांना गोळी घातली असती. त्याने गांधींना गोळी घातली नसती. गांधींना का मारलं असतं? जिनाने पाकिस्तानची मागणी केली होती. त्यांनीच देशाची फाळणी घडवून आणली. ज्यांनी पाकिस्तानची मागणी केली त्यांना गोळी घालायला हवी होती. तुमच्यात हिंमत होती तर जिनांना गोळी घालायला हवी होती. एका फकिराला गोळी मारणं योग्य नव्हतं, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेला घाबरले

उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या सात उमेदवारांचे नामांकन अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले आहेत. आम्ही कागदपत्रं दिले होते. त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केलाय. आमच्याकडे त्याबाबत पुरावे आहेत. आमचे उमेदवार 3 वाजण्याच्या आधी पोहोचले होते. तरी देखील नामांकन अर्ज रद्द करण्यात आले आहेत. डीएम ऐकत नाही. दबावात काम करत आहेत. ते शिवसेनेला घाबरले आहेत. ही लोकशाही नाहीये. याबाबत आम्ही आवाज उठवणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

निवडणूक आयोगाकडे मागणी करू

मी दिल्लीत जाणार आहे. निवडणुक आयोगाकडे आम्ही ही मागणी करू. निवडणुका निरपेक्ष व्हायला हव्यात. पण आम्ही लढवत असल्याने त्यांना भीती आहे. आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशातून निवडणुक लढतोय. नोएडा, बिजनौरमधील अर्ज रद्द केलेत. गुड्डू पंडित यांचा अर्ज रद्द केला आहे, असं ते म्हणाले. गोव्यात प्रमोद सावंत यांच्याबाबतही तेच झालं. कुणाला तरी आमची भीती वाटतेय. आमचे अर्ज रद्द करण्यात आलेत, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?: राऊत

संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Nagpur Crime | वेकोलीचा व्यवस्थापक सीबीआयच्या जाळ्यात; कंत्राटदाराकडून कशासाठी मागितली लाच?

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.