AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी प्रार्थना… आता आंदोलन… कबूतरखान्यासाठी जैन समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांसोबत बाचाबाची

जैन समाज मोठ्या संख्येने कबूतर खाना परिसरात पोहोचला आहे. लोक कबूतर खान्यातील ताटपत्री काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली आहे. जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे यावेळी बघायला मिळत आहे.

आधी प्रार्थना... आता आंदोलन... कबूतरखान्यासाठी जैन समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांसोबत बाचाबाची
mumbai
| Updated on: Aug 06, 2025 | 10:50 AM
Share

कबूतरखाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आता जैन समाज मोठ्या संख्येने कबूतरखाना परिसरात पोहोचला आहे. लोक कबूतर खान्यातील ताटपत्री काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महिला या कबूतर खान्यात उतरल्या असून महापालिकेने लावलेली ताडपत्री त्यांनी काढून टाकली आहे. पोलिस आणि आंदोलकांनी बाचाबाची झालीये. पोलिस आंदोलकांना थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक हे आक्रमक झाली आहेत. जैन समाज आणि आंदोलकांमध्ये सध्या झटापट सुरू आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतर खाना बंद करण्यात आला. मात्र, कबूतरखाना बंद केल्यानंतरही मनाई असताना लोक कबूतरांना धान्य टाकत असल्याचे लक्षात आले. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत कबूतरांना धान्य टाकणाऱ्यांवर सक्त कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर महापालिकेकडून दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली. जेणे करून लोक तिथे धान्य टाकू शकणार नाहीत आणि कबूतर तिथे बसणार नाहीत.

ताडपत्री टाकल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला. आधी त्यांनी म्हटले की, आम्ही कबूतरखान्याजवळ प्रार्थना सभा घेणार आहोत. त्यानंतर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर सांगण्यात आले की, आंदोलन रद्द करण्यात आलंय. मात्र, आज सकाळी प्रत्यक्षात जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी एकच हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडली.

यावेळी पोलिसांसोबत त्यांनी बाचाबाची झाली. मात्र, जैन समाज चांगलाच आक्रमक झाला. महिला या कबूतरखान्यामध्ये उतरल्या आहेत. पालिकेकडून बांधण्यात आलेली ताडपत्री काढण्यात आलीये. यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त देखील तिथे पोहोचला आहे. मात्र, या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे बघायला मिळतंय. अगोदरपासूनच या भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या दादरमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे बघायला मिळतंय.

कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महापालिकेने नियंत्रित पद्धतीने खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिलेयत. त्यामुळे सरकारने जैन समाजाच्या दबावापुढे नमते घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. भाजप राजकीय फायद्यासाठीच जैन समाजाला खूश करीत असल्याची टीका शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केलीये.

जैन समाजातील काही जणांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाची मागणी मान्य करीत सपशेल माघार घेतल्याची टीका शिवसेना (ठाकरे) व मनसेने केली आहे. कबुतरखान्यांबाबत जैन धर्मीयांच्या मताचाही आदर आहे. मात्र कबुतरांमुळे क्षयरोगासारखा आजार पसरत असेल तर कबुतरखान्यांच्या परिसरात अशा प्रकारचे किती रुग्ण आढळले याचेही सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाचे स्थानिक आमदार मदेश सावंत यांनी म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.