AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला कसलाच नाही पश्चाताप, जयदीप आपटेचा कांगावा कमी होईना, म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामुळे कोसळला, जामिनासाठी घेतली हायकोर्टात धाव

Jaydeep Apte High Court Bail : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे याला पश्चाताप झालाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात त्याने हायकोर्टात जामीनासाठी धाव घेतली आहे. या प्रकरणात त्याला निष्काळजीपणा झाल्याचे जणू मान्यच नसल्याचे दिसून येत आहे.

याला कसलाच नाही पश्चाताप, जयदीप आपटेचा कांगावा कमी होईना, म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामुळे कोसळला, जामिनासाठी घेतली हायकोर्टात धाव
जयदीप आपटेची जामीनासाठी हायकोर्टात धाव
| Updated on: Nov 08, 2024 | 10:38 AM
Share

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यात अटक करण्यात आलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याला पश्चातापाचा लवलेश नसल्याचे समोर येत आहे. पुतळा उभारताना आपटेने निष्काळजीपणा केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यातीलच नाही देशातील शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्धघाटन केले होते. हा पुतळा घाईगडबडीत उभारल्याचा विरोधकांचा आरोप होता. आता याप्रकरणात हात झटकण्याचा प्रयत्न आपटे करताना दिसत आहे. त्याने जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.

म्हणे वाऱ्यानेच कोसळला पुतळा

शिल्पकार जयदीप आपटेने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यात पुतळा कोसळून कोणत्याही व्यक्तीला कसलीही शारिरीक दुखापत, इजा झाला नसल्याचा दावा त्याने केला आहे. एफआयआरमध्ये तसा उल्लेख नसल्याचा त्याचा दावा आहे. तर हा पुतळा कोसळण्यासाठी त्याने सोसाट्याचा वाऱ्याला दोष दिला आहे.

आपटेने पाजळले सरकारला ज्ञान

सोसाट्याच्या वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचा कांगावा जयदीप आपटे याने केला आहे. आपल्याला या प्रकरणात सरकारने नाहक गोवण्यात आले आहे. अशा घटनेला मानवी कृत्य जबाबदार धरण्यात येऊ शकत नाही, असा त्याचा दावा आहे. नेव्हल डॉकयार्डने पुतळा उभारल्यानंतर तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी कामात त्रुटी असल्याची तक्रार दिली नव्हती. पण दुर्घटना घडल्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्याने त्रुटी असल्याचे सांगत अवघ्या नऊ तासातच एफआयआर दाखल केल्याचे त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणात तज्ज्ञांची समितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याविरोधात पुढील कारवाई व्हायला हवी होती, असे त्याने जामीन अर्जात म्हटले आहे.

हायकोर्टात जामीनासाठी धाव

जयदीप आपटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सिंधुदुर्ग जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रकरणात सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या जामीन अर्जावर आता 12 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.