AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांचा प्रवास होणार आता अधिक सुकर; 500 पेक्षा अधिक रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात, मंत्री आदित्य ठाकरेंनी केली कामाची पहाणी

मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुकर होणार आहे. सध्या शहरात एकूण 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. नुकतीच मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या या कामांची पहाणी केली.

मुंबईकरांचा प्रवास होणार आता अधिक सुकर; 500 पेक्षा अधिक रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात, मंत्री आदित्य ठाकरेंनी केली कामाची पहाणी
Image Credit source: TV9
| Updated on: May 19, 2022 | 7:47 AM
Share

मुंबई : मुंबईकरांना महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) माध्यमातून दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 2210.9 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या रस्त्यांची पहाणी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून मध्यरात्री करण्यात आली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामांची माहिती देखील घेतली. मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शहरात 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 2210.9 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 295 रस्त्यांची कामे वेगाने सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. उर्वरित 210 रस्त्यांची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. हे सर्व रस्ते बांधून पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. तसेच वाहतूककोंडीची समस्या देखील काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या अखत्यारीत 2 हजार किमीचे रस्ते

मुंबई महापालिकेच्या अंडरमध्ये सद्यास्थितीत सुमारे 2 हजार किलोमिटरचे रस्ते आहेत. या रस्त्याची देखभाल तसेच नवीन रस्ते निर्मितीची कामे महापालिकेच्या संबंधित समितीमार्फत करण्यात येतात. या रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी या वर्षीपासून आता रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण रस्ते विभागाकडे करावे लागणार आहे. यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी तीन ते सहा वर्ष त्या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ही कंत्राटदारांची असणार आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून रस्त्यांची पहाणी

मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा, त्यांची वाहतूककोंडीतून सूटका व्हावी यासाठी सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यातील 295 रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून, उर्वरित 210 रस्त्यांची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासाठी 2210.9 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावीत आहे. दरम्यान काल मध्यरात्री पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या बांधकामाची पहाणी केली, तसेच त्यांच्याकडून रस्त्यांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक