AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या तुफानी पावसातील वॉरिअर, कांताबाईंचं प्रसंगावधान, सहा तास ‘मॅनहोल’जवळ थांबून वाहतुकीचं नियंत्रण

मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी फूटपाथवर राहणाऱ्या महिलेने भर पावसात रस्त्यावर उभं राहून मोलाचं काम केलं (Kantabai Mumbai rain warrior )

मुंबईच्या तुफानी पावसातील वॉरिअर, कांताबाईंचं प्रसंगावधान, सहा तास 'मॅनहोल'जवळ थांबून वाहतुकीचं नियंत्रण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 08, 2020 | 1:20 PM
Share

मुंबई : मुंबईच्या तुफान पावसात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे, मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी फूटपाथवर राहणाऱ्या महिलेने भर पावसात रस्त्यावर उभं राहून मोलाचं काम केलं. कांताबाई असं मुंबईच्या पुरातील या वॉरिअर्सचं नाव आहे. (Kantabai Mumbai rain warrior)

मुंबईत बुधवारी जोरदार पाऊस झाला. तुफान वाऱ्यामुळे कधीही न तुंबणारी दक्षिण मुंबईही तुंबली. मुंबईच्या अनेक भागात पाणी-पाणी झालं होतं. रस्ते वाहतूक बंद झाली, पाण्याच्या निचरा होत नव्हता. माटुंगा परिसरातील रस्ते बुडाले होते. पाणी निचरा करणासाठी पालिकेचे कसोशिने प्रयत्न करत होते. जिथे हे कर्मचारी पोहोचले नव्हते, तेव्हा पाण्याचा निचरा करण्याचं काम एका रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या महिलेने केलं. तीच महिला म्हणजे कांताबाई. कांताबाईंचा व्हिडीओ सध्या मुंबईच्या पुरातील वॉरिअर्स म्हणून सोशल मीडियावर फिरत आहे.

कांता रत्नमूर्ती (Kanta Ratnamurty) या माटुंगा स्टेशनबाहेर तुलसी पाईप रोडच्या बाजूला फुटपाथवर राहतात. बुधवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुंबईच्या बऱ्याच भागात 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. ज्या भागात नेहमी पाणी भरत नाही, अशा भागात सुद्धा पाणी तुंबलं. (Kantabai Mumbai rain warrior)

त्यादिवशी माटुंगा परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. कांताबाईंनी पालिका प्रशासनाची वाट बघितली पण कोण न आल्याने रस्त्यावरील मॅनहोल उघडा केला, त्या उघडया मॅनहॉलमध्ये लाकडी बांबू टाकून, कांता बाई स्वतः तेथे उभ्या राहिल्या. तब्बल 6 तास त्या पाण्याचा निचरा होईपर्यंत उभ्या होत्या.

समोरुन येणारी गाडी मॅनहोलमध्ये अडकू नये म्हणून त्या स्वत: गाड्यांना हाताने दिशा दाखवून सुरक्षित करत होत्या. कांताबाईंचा हा व्हिडीओ कौतुकाने फॉरवर्ड केला जात आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना, कांताबाईंनी बुधवारच्या पावसाचा अनुभव सांगितला.

“पाऊस मोठा आणि पाणी खूप तुंबलं होतं. पाणी वेगाने वाढत होतं. पाण्याचा निचरा होत होता. त्यामुळे मी मॅनहोल उघडला. मात्र त्यामध्ये कोणी पडू नये किंवा कोणताही अपघात होऊ नये, याची मी काळजी घेतली”, असं कांता यांनी सांगितलं.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?