AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांनी टाइमपास न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे; आयएनएस विक्रांतप्रकरणी सोमय्यांचे आव्हान

सोमय्या म्हणाले की, ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत.

राऊतांनी टाइमपास न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे; आयएनएस विक्रांतप्रकरणी सोमय्यांचे आव्हान
संजय राऊत आणि किरीट सोमय्या.
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 9:54 AM
Share

मुंबईः आयएनएस विक्रांतप्रकरणी मी काही घोटाळा केल्याचा संशय असेल, तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुरावे द्यावेत. उगीच या प्रकरणात टाइमपास करून वेळ वाया घालवू नये, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी बुधवारी दिले आहे. संजय राऊत यांच्या मालमत्तेवर मंगळवारी ईडीने टाच आणली. त्यानंतर शिवसेना आणि भाजप विरोधातल्या कुरघोडीच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवून दिली. त्यात त्यांनी विशेषतः भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे विविध आरोप करून वस्त्रहरण केले. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. मात्र, हे पैसे जमा केलेच नाहीत, असा दावा राऊत यांनी केला. त्याला तात्काळ किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. या अतिशय महत्त्वाच्या आणि टोकाच्या विरोधाचा राजकीय सवाल-जबाब जाणून घेऊयात.

राऊतांचे आरोप काय?

संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले. कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी. विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली, याचा छडा लावावा, असे आव्हान त्यांनी दिले. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.

सोमय्यांचे उत्तर काय?

संजय राऊतांच्या आरोपाला किरीट सोमय्यांनी जोरदार उत्तर दिले. सोमय्या म्हणाले की, ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात. संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या एका कंपनीविरोधात भारत सरकारने कालच मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केलाय. ही कंपनी जानेवारी 2021 मध्ये बनवली. दोन महिन्यांत परवानगी मागितली, कोविड कामे मिळवली, असा आरोप त्यांनी केला.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.