AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी, खारघर मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

खारघर मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे अनेक जणांचा मृत्यू झालेला. या प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका केली जातेय. याच प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारचं टेन्शन वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी, खारघर मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 24, 2023 | 7:29 PM
Share

मुंबई : खारघरमधील दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खर्च केलेले 14 कोटी रुपये आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. व्हीआयपी पाहुणे एसीमध्ये जेवले, तर लोकांना मरण्यासाठी सोडून दिलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला जातोय. याप्रकरणी वेगवेगळे दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. असं असताना आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करावी. कारण त्यांनी राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

आता याचिकेवर काय सुनावणी होते, याबाबत कधी सुनावणी होते, मुंबई उच्च न्यायालय काही निर्देश देतं का, सुनावणीत काय-काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार आणि न्याय व्यवस्था या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आजच सरकारला औरंगाबादच्या नामांतराबद्दल महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात खारघर दुर्घटनेप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

खारघरमध्ये गेल्या आठवड्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रधान सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमासाठी तब्बल 14 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखो श्रीसेवक खारघर येथे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. पण हा कार्यक्रम दुपारी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित श्रीसेवकांना ऊन्हाचा त्रास झाला. यामध्ये अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातून 50 ते 60 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला.

खारघरमधील या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ हे अस्वस्थ करणारे आहेत. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जातोय. तर काहींचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेप्रकरणी विरोधकांकडून सरकारवर सातत्याने निशाणा साधला जातोय.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार