AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना “पाजण्याचा” घाट कोण घालतेय?’

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प महागडा असल्याने त्याचा फेरविचार करावा अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

'कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना पाजण्याचा घाट कोण घालतेय?'
| Edited By: | Updated on: Dec 03, 2020 | 7:38 PM
Share

मुंबई : कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना “पाजण्याचा” घाट कोण घालतेय? असा थेट सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी पालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) पत्रही पाठवलं आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प महागडा असल्याने त्याचा फेरविचार करावा अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)

सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प आता 440 दशलक्ष लिटर करण्यात येत असून त्याचा खर्च 3500 कोटीपर्यंत होणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी नुकतेच जाहीर केले आहे. जर हा प्रकल्प झाला तर गारगाई प्रकल्पाची गरज भासणार नाही असेही पालिका सांगते आहे. मग गारगाई प्रकल्प रद्द करण्यात आला का? त्याचा निर्णय कुणी व कधी घेतला? असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.

इतकंच नाही तर आर्थिक दुष्ट्या गारगाईपेक्षा समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महागडा ठरणार आहे. मग कंत्राटदारांची भलामण का केली जात आहे? महागडे पाणी मुंबईकरांच्या माथी का मारताय? असे प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी आयुक्तांना सविस्तर पत्र लिहिले आहे. तसेच एकिकडे कोव्हिडमुळे पालिकेचा निधी खर्च करण्याबाबत विचारपुर्वक निर्णय घेण्याची वेळ असताना पालिका मुंबईकरांच्या कष्टाच्या निधीची उधळपट्टी का करते आहे असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. (Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)

दरम्यान, यावर भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘युनायटेड नेशनचा अभ्यास सांगतो समुद्राचे पाणी गोड केल्यानंतर जे रासायनिक पाणी उरतं, तयार होते त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होत असतो. 440 दशलक्ष पाणी गोड केल्यानंतर 370 दशलक्ष लीटर पाणी हे रासायनिक गुण असलेल होणार आहे त्याची विल्हेवाट कशी लागणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर समुद्राच पाणी गोड करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा आढावा घ्यावा आणि पुनर्विचार करावा आमची मागणी आहे आशिष शेलार यांनी आयुक्तांकडे केली आहे.

इतर बातम्या – 

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे ‘परावलंबी वर्ष’; आशिष शेलारांचा टोला

(Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ