AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना “पाजण्याचा” घाट कोण घालतेय?’

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प महागडा असल्याने त्याचा फेरविचार करावा अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

'कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना पाजण्याचा घाट कोण घालतेय?'
| Edited By: | Updated on: Dec 03, 2020 | 7:38 PM
Share

मुंबई : कंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना “पाजण्याचा” घाट कोण घालतेय? असा थेट सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी पालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) पत्रही पाठवलं आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प महागडा असल्याने त्याचा फेरविचार करावा अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)

सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रकल्प आता 440 दशलक्ष लिटर करण्यात येत असून त्याचा खर्च 3500 कोटीपर्यंत होणार असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी नुकतेच जाहीर केले आहे. जर हा प्रकल्प झाला तर गारगाई प्रकल्पाची गरज भासणार नाही असेही पालिका सांगते आहे. मग गारगाई प्रकल्प रद्द करण्यात आला का? त्याचा निर्णय कुणी व कधी घेतला? असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.

इतकंच नाही तर आर्थिक दुष्ट्या गारगाईपेक्षा समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महागडा ठरणार आहे. मग कंत्राटदारांची भलामण का केली जात आहे? महागडे पाणी मुंबईकरांच्या माथी का मारताय? असे प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी आयुक्तांना सविस्तर पत्र लिहिले आहे. तसेच एकिकडे कोव्हिडमुळे पालिकेचा निधी खर्च करण्याबाबत विचारपुर्वक निर्णय घेण्याची वेळ असताना पालिका मुंबईकरांच्या कष्टाच्या निधीची उधळपट्टी का करते आहे असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. (Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)

दरम्यान, यावर भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘युनायटेड नेशनचा अभ्यास सांगतो समुद्राचे पाणी गोड केल्यानंतर जे रासायनिक पाणी उरतं, तयार होते त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होत असतो. 440 दशलक्ष पाणी गोड केल्यानंतर 370 दशलक्ष लीटर पाणी हे रासायनिक गुण असलेल होणार आहे त्याची विल्हेवाट कशी लागणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर समुद्राच पाणी गोड करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा आढावा घ्यावा आणि पुनर्विचार करावा आमची मागणी आहे आशिष शेलार यांनी आयुक्तांकडे केली आहे.

इतर बातम्या – 

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे ‘परावलंबी वर्ष’; आशिष शेलारांचा टोला

(Letter of Ashish Shelar to mumbai water source to Municipal Commissioner)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.