हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे ‘परावलंबी वर्ष’; आशिष शेलारांचा टोला

राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून सरकारच्या कामांची जंत्री दिली जात असतानाच विरोधकांनी मात्र सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. (ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे 'परावलंबी वर्ष'; आशिष शेलारांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 2:28 PM

मुंबई: राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून सरकारच्या कामांची जंत्री दिली जात असतानाच विरोधकांनी मात्र सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. राज्यातील तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केलंय. हे तर परावलंबी सरकार आहे, असा टोला भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. (ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

आशिष शेलार यांनी ट्विट करून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीची परावलंबी वर्ष म्हणत संभावना केली आहे. तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही, ठोस निर्णय नाही, शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही… खंबीर आधार नाही… फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवरही शेलार यांनी सडकून टीका केली आहे. शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्याबाबतीत संभ्रम आहे. कापूस, धान खरेदी झाली नाही, शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही? याची हमी नाही. अहो, जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुध्दा होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचे कसले ‘अभिनंदन’ आणि कसल्या मुलाखती!, असा सवालही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते मुलाखतीत?

  • सरकारला जनतेचे आशीर्वाद आहेत. ईडी आणि सीबीआयची भीती कुणाला दाखवता?
  • सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत.
  • सीबीआयचा दुरुपयोग होऊ लागतो तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची.
  • सरकार चालवताना कसरत करतोय असं वाटत नाही. कारण काहीही असेल, पण तीनही पक्ष एकमेकांत असे मिसळून गेले आहेत. अगदी अजितदादा आहेत… बाळासाहेब थोरात आहेत, अशोकराव आहेत… कुणाकुणाची नावं घेऊ? नितीनराव आहेत, जितेंद्र आहे, वडेट्टीवार आहे, हसन मुश्रीफ आहेत, नवाबभाई आहेत… सगळ्यांचीच नावं घ्यावीशी वाटत आहेत, पण किती जणांची नावं घेऊ… सगळे माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागताहेत. (ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

संबंधित बातम्या:

Nitin Raut | विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न, नितीन राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

सदसदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? न्यायालयाचे दोन निकाल तुमची कामगिरी सांगते, फडणवीसांचा हल्लाबोल

भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

(ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.