AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Elections 2024 : मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाच्या संपत्ती वाढीचा दर राहिला ६६९ टक्के

Lok Sabha Elections 2024 : गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत. तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

Lok Sabha Elections 2024 : मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाच्या संपत्ती वाढीचा दर राहिला ६६९ टक्के
मुंबई
| Updated on: May 15, 2024 | 9:35 AM
Share

लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्यात मुंबईतील सहा मतदार संघात मतदान होणार आहे. या मतदार संघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचवेळी ‘मुंबई वोट्स’ या संस्थेने मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती वाढली? कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत? याचा अहवाल तयार केला आहे. ‘मुंबई वोट्स’ या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. गोयल यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. तसेच विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

सर्वाधिक संपत्ती कोणाची वाढली

पीयूष गोयल यांच्यानंतर रवींद्र वायकर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ५४.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. तसेच भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांच्याकडे ४०.४७ कोटीं संपत्ती आहे.

सर्वाधिक संपत्ती खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढली आहे. त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग ६६९ टक्के आहे. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांची संपत्ती वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ ६१९ टक्के राहिली. काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भूषण पाटील यांची संपत्ती ४८३ टक्के वाढली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ ३.५ टक्के आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत. तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

किरकोळ स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे. वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खून, खंडणी, धमकाविणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या यादीत वंचित बहुजन आघाडी प्रथम क्रमांकावर आहे. समता पक्ष द्वितीय तर रिपब्लिकन बहुजन सेना तिसऱ्या स्थानावर आहेत.

अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे....
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे.....
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल.
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल.
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ.
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का.
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?.
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण.
भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी तयार तर काँग्रेसकडे उपरण्याचा दुष्काळ!
भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी तयार तर काँग्रेसकडे उपरण्याचा दुष्काळ!.
'वर्षावरच्या बैठकीत पार्थवरून दादा संतापले सरकारमधून बाहेर पडतो अन्..'
'वर्षावरच्या बैठकीत पार्थवरून दादा संतापले सरकारमधून बाहेर पडतो अन्..'.