Lok Sabha Elections 2024 : मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाच्या संपत्ती वाढीचा दर राहिला ६६९ टक्के

Lok Sabha Elections 2024 : गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत. तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

Lok Sabha Elections 2024 : मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाच्या संपत्ती वाढीचा दर राहिला ६६९ टक्के
मुंबई
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 9:35 AM

लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्यात मुंबईतील सहा मतदार संघात मतदान होणार आहे. या मतदार संघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचवेळी ‘मुंबई वोट्स’ या संस्थेने मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती वाढली? कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत? याचा अहवाल तयार केला आहे. ‘मुंबई वोट्स’ या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. गोयल यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. तसेच विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

सर्वाधिक संपत्ती कोणाची वाढली

पीयूष गोयल यांच्यानंतर रवींद्र वायकर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ५४.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. तसेच भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांच्याकडे ४०.४७ कोटीं संपत्ती आहे.

सर्वाधिक संपत्ती खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढली आहे. त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग ६६९ टक्के आहे. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांची संपत्ती वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ ६१९ टक्के राहिली. काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भूषण पाटील यांची संपत्ती ४८३ टक्के वाढली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ ३.५ टक्के आहे.

हे सुद्धा वाचा

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत. तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

किरकोळ स्वरूपातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे. वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खून, खंडणी, धमकाविणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या यादीत वंचित बहुजन आघाडी प्रथम क्रमांकावर आहे. समता पक्ष द्वितीय तर रिपब्लिकन बहुजन सेना तिसऱ्या स्थानावर आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.