AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला

ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला
| Updated on: Dec 29, 2020 | 5:15 PM
Share

मुंबई: ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्याकडे 171 आमदार असून आमचे सरकार दमदारपणे काम करत आहे. मागेही मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. पण या सरकारने वर्षपूर्ती पूर्ण केली असून सरकारला कोणताही धोका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधत राज्यातील विविध विषयांवर आपलं मत मांडलं. सरकार पडेल म्हणून काही लोक पहिल्या दिवसापासून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आमच्याकडे 171 आमदार आहेत. सरकारला काहीही धोका नाही. गेल्यावर्षी मार्चमध्येही सरकार पडण्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. त्यानंतरही आम्ही दमदारपणे काम करत असून हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

सुडाचं राजकारण दुर्देवी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दुर्देवी बाब आहे. सुडाचं राजकारण कोणीही करू नये, द्वेषाचं हे राजकारण दीर्घकाळ टिकत नसं, असं त्यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. त्यात कोणी जिंकतो तर कोणी पराभूत होत असतो. भाजपला लोकांनी विरोधात बसवलं असून महाविकास आघाडी लोकहिताचे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागे या

गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. केंद्राने दोन पावलं मागे यायला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच सुरू होईल. या विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं उचित आहे. राज्यासाठीचं बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे मोठ्या वास्तूंना राज्यातील मोठ्या व्यक्तींची नावे आपण देत असतो. आम्हाला ही या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं असं वाटतं, असंही ते म्हणाले. (Maha Vikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

क्लस्टर योजना हा क्रांतीकारी योजना

ठाण्यात क्लस्टर योजना लागू करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. क्लस्टर डेव्हल्पेमेंट प्रत्यक्षात कार्यन्वित झालं पाहिजे. यासाठी ठाण्यातील विविध भागात बैठका सुरू आहेत. लाखो ठाणेकरांच्या जीवणमरणाचा विषय असल्याने ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी शेवटी सांगितलं. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

संबंधित बातम्या:

मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला, संजय राऊत बिथरल्याची टीका

काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

शिवसेनेचा वकील मंत्री संजय राऊतांच्या भेटीला; ED नोटीसच्या कायदेशीर बाबींवर चर्चा

(Maha Vikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.