AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला

ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळला
| Updated on: Dec 29, 2020 | 5:15 PM
Share

मुंबई: ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलेला दावा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्याकडे 171 आमदार असून आमचे सरकार दमदारपणे काम करत आहे. मागेही मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. पण या सरकारने वर्षपूर्ती पूर्ण केली असून सरकारला कोणताही धोका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधत राज्यातील विविध विषयांवर आपलं मत मांडलं. सरकार पडेल म्हणून काही लोक पहिल्या दिवसापासून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आमच्याकडे 171 आमदार आहेत. सरकारला काहीही धोका नाही. गेल्यावर्षी मार्चमध्येही सरकार पडण्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. त्यानंतरही आम्ही दमदारपणे काम करत असून हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

सुडाचं राजकारण दुर्देवी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दुर्देवी बाब आहे. सुडाचं राजकारण कोणीही करू नये, द्वेषाचं हे राजकारण दीर्घकाळ टिकत नसं, असं त्यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. त्यात कोणी जिंकतो तर कोणी पराभूत होत असतो. भाजपला लोकांनी विरोधात बसवलं असून महाविकास आघाडी लोकहिताचे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी दोन पावलं मागे या

गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. केंद्राने दोन पावलं मागे यायला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच सुरू होईल. या विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं उचित आहे. राज्यासाठीचं बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे मोठ्या वास्तूंना राज्यातील मोठ्या व्यक्तींची नावे आपण देत असतो. आम्हाला ही या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं असं वाटतं, असंही ते म्हणाले. (Maha Vikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

क्लस्टर योजना हा क्रांतीकारी योजना

ठाण्यात क्लस्टर योजना लागू करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. क्लस्टर डेव्हल्पेमेंट प्रत्यक्षात कार्यन्वित झालं पाहिजे. यासाठी ठाण्यातील विविध भागात बैठका सुरू आहेत. लाखो ठाणेकरांच्या जीवणमरणाचा विषय असल्याने ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी शेवटी सांगितलं. (MahaVikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

संबंधित बातम्या:

मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला, संजय राऊत बिथरल्याची टीका

काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

शिवसेनेचा वकील मंत्री संजय राऊतांच्या भेटीला; ED नोटीसच्या कायदेशीर बाबींवर चर्चा

(Maha Vikas Aghadi government is strong and stable, says eknath shinde)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.