AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget Rural Area| गावागावांमध्ये उत्साह संचारणार, शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाची घोषणा

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण अभियान जाहीर केलं. ShivRajya Sundar Gram Abhiyan

Maharashtra Budget Rural Area| गावागावांमध्ये उत्साह संचारणार, शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाची घोषणा
शिवराज्य सुंदर ग्राम अभियान
| Updated on: Mar 08, 2021 | 5:16 PM
Share

मुंबई: उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण अभियान जाहीर केलं. उपमुख्यमंत्र्यांनी शिवराज्य सुंदर ग्राम अभियान जाहीर केलं आहे. शिवराज्य सुंदर ग्राम अभियानामुळे राज्याच्या ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानावेळी निर्माण झालेले उत्साहात्मक वातावरण पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Budget 2021 Ajit Pawar declared ShivRajya Sundar Gram Abhiyan for all Gram Panchayat in States)

शिवराज्य सुंदर ग्राम अभियान नेमकं काय?

ग्रामीण भागातील घनकचरा, सांडपाणी, शौचालय, व स्वच्छताविषयक कामे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गावातील वृद्ध नागरिक, महिला व बालकांसाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचं जीवनमान उंचावणं हा शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.

ग्राम विकास खात्याला बजेटमध्ये काय मिळालं?

सन 2020-21 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेअंतर्गत एकूण 2 हाजर 924 कोटी 88 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. सन 2021-22 या आर्थिक वर्षात घरकुल योजनांसाठी 6 हजार 829 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचं अभिनंदन करतो. आजपर्यंत आपण पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणं अर्थसंकल्प माडला गेला. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. कोणतेही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचं काम अर्थसंकल्पानं केलं आहे.प्रत्येकाला त्यांच्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Budget 2021 Ajit Pawar full speech : महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प

मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

(Maharashtra Budget 2021 Ajit Pawar declared ShivRajya Sundar Gram Abhiyan for all Gram Panchayat in States)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.