AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हालचाली वाढल्या, अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, मुंबईत मोठ्या घडामोडी

Ajit Pawar meets Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक नुकतंच जेलमधून बाहेर आले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केलाय. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर आता अजित पवार त्यांच्या भे्टीला गेले.

हालचाली वाढल्या, अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, मुंबईत मोठ्या घडामोडी
| Updated on: Aug 16, 2023 | 8:00 PM
Share

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या भेटीला गेले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आजच नवाब मलिक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार हे नवाब मलिक यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार यांच्यासोबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील नवाब मलिक यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

नवाब मलिक हे गेल्या दीड वर्षांपासून जेलमध्ये होते. ते सध्या आजारी असल्याने त्यांना उपचारांसाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर झालाय. सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालाय. जामीन मिळाल्यानंतर ते जेलमधून बाहेर आले आहेत. ते जेलमध्ये गेले त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता. पण आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ते काय भूमिका जाहीर करतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटात जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक यांच्या भेटीनंतर अनिल देशमुख काय म्हणाले?

दरम्यान, नवाब मलिक यांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलं आहे. त्यांची सुटका झाली म्हणून आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो. त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. दीड वर्षांपासून त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांचं वजन कमी झालंय. त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. बाकी काही राजकीय चर्चा केली नाही”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

“नवाब मलिक आताच बाहेर आले आहेत. ते सर्वांना भेटतात. बाहेरच्या लोकांनाही भेटतात. इतके दिवस घरच्यांपासून लांब होते. ते आता घरी आले आहेत. सध्या ते घरच्यांना भेटत आहेत. शेवटी सर्वात आधी फॅमिली मग नंतर राजकारण”, असंही ते यावेळी म्हणाले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.