Mumbai lake water levels : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा? महत्त्वाची अपडेट समोर
mumbai water stock : मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पाणीसाठा निम्म्यावर पोहोचला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या सर्व धरणांतील पाणीसाठा 48.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणीसाठा निम्म्यावर पोहोचल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची पाणीसाठ्याची क्षमता ही 14,47,363 दक्षलक्ष इतकी आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पाणीसाठा 7,03,260 दक्षलक्ष पर्यंत पोहोचला आहे. एकंदरीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पाणीसाठा निम्म्यापर्यंत पोहोचलाय. मागील आठवड्याभरात कोसलळेल्या पावसामुळे जलाशयांत मोठी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयापैकी विहार आणि तुलसी तलाव हे 100 टक्के भरले आहेत. विहार तलावात 27,698 दक्षलक्ष पाणीसाठा झाला आहे. तर तुलसी तलावात 8,046 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.
Mumbai’s reservoirs reach 48.6% capacity, Modak Sagar crosses 80% as monsoon recovery continues
🤞🏻🙏🏻 pic.twitter.com/6fQVWp4Nim
— Mumbai Lakes (@MumbaiLakes) July 9, 2026
मोडक सागर धरणातही पाणीसाठा प्रचंड वेगाने वाढत आहे. या धरणात 1,06,566 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकंदरीत मोडक सागर धरण हे तब्बल 82 टक्के भरले आहे. तानसा धरणाताली पाणीसाठा देखील 77.48 टक्क्यांवर पोहोचला असून पाणीसाठा 1,12,413 दक्षलक्ष इतका झाला आहे. भासतसा धरणात 42.६८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या भातसा धरणात 3,06,002 दक्षलक्ष पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा धरणात 61,028 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झालाय. मध्य वैतरणा धरणातही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. या धरणात 81,508 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झालाय. अप्पर वैतरणा, तानसा आणि मध्य वैतरणा या तिन्ही धरणातील पाणीसाठा 52.05 टक्क्यांवर पोहोचला असून पाणीसाठा 3,61,514 दक्षलक्ष इतकं झालं आहे.
पाणीकपातीचं संकट दूर होणार?
मुंबईला तुळशी, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तानसा या धरणांतून पाणीसाठा पुरवला जातो. या धरणांतून दिवसांतून दररोज 4,10 दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे वर्षभरात पाण्याची गरज भासवण्यासाठी मुंबईला 14 लाख 47 हजार 363 दक्षलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यात आता सातही धरणात पाणीसाठा निम्म्यावर पोहोचलाय. पुढील काही दिवस धरणक्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली, तर धरणांत पाण्याच्या पातळीत झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचं संकट लवकरच दूर होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
