AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai lake water levels : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा? महत्त्वाची अपडेट समोर

mumbai water stock : मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पाणीसाठा निम्म्यावर पोहोचला आहे.

Mumbai lake water levels : मोठी बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा? महत्त्वाची अपडेट समोर
| Updated on: Jul 10, 2026 | 7:44 AM
Share

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या सर्व धरणांतील पाणीसाठा 48.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणीसाठा निम्म्यावर पोहोचल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची पाणीसाठ्याची क्षमता ही 14,47,363 दक्षलक्ष इतकी आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पाणीसाठा 7,03,260 दक्षलक्ष पर्यंत पोहोचला आहे. एकंदरीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पाणीसाठा निम्म्यापर्यंत पोहोचलाय. मागील आठवड्याभरात कोसलळेल्या पावसामुळे जलाशयांत मोठी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयापैकी विहार आणि तुलसी तलाव हे 100 टक्के भरले आहेत. विहार तलावात 27,698 दक्षलक्ष पाणीसाठा झाला आहे. तर तुलसी तलावात 8,046 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.

मोडक सागर धरणातही पाणीसाठा प्रचंड वेगाने वाढत आहे. या धरणात 1,06,566 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकंदरीत मोडक सागर धरण हे तब्बल 82 टक्के भरले आहे. तानसा धरणाताली पाणीसाठा देखील 77.48 टक्क्यांवर पोहोचला असून पाणीसाठा 1,12,413 दक्षलक्ष इतका झाला आहे. भासतसा धरणात 42.६८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या भातसा धरणात 3,06,002 दक्षलक्ष पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा धरणात 61,028 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झालाय. मध्य वैतरणा धरणातही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. या धरणात 81,508 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झालाय. अप्पर वैतरणा, तानसा आणि मध्य वैतरणा या तिन्ही धरणातील पाणीसाठा 52.05 टक्क्यांवर पोहोचला असून पाणीसाठा 3,61,514 दक्षलक्ष इतकं झालं आहे.

पाणीकपातीचं संकट दूर होणार?

मुंबईला तुळशी, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तानसा या धरणांतून पाणीसाठा पुरवला जातो. या धरणांतून दिवसांतून दररोज 4,10 दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे वर्षभरात पाण्याची गरज भासवण्यासाठी मुंबईला 14 लाख 47 हजार 363 दक्षलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यात आता सातही धरणात पाणीसाठा निम्म्यावर पोहोचलाय. पुढील काही दिवस धरणक्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली, तर धरणांत पाण्याच्या पातळीत झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचं संकट लवकरच दूर होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा