AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 14 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?

दररोज सुमारे 2 टन (960 एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे 200 ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो. (Maharashtra Construct Oxygen Plant at 14 places)

राज्यात 14 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?
ऑक्सिजन
| Updated on: Apr 25, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे राज्यातील ऑक्सिजनच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट उभारण्यात येणार आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल 12 महापालिका क्षेत्रात 14 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारले जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा पुढाकार घेतला आहे. (Maharashtra Government will Construct Oxygen Plant at 14 places)

मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित केले जाणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दररोज सुमारे 2 टन ऑक्सिजनची निर्मिती

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणता एका प्लांटमधून दररोज सुमारे 2 टन (960 एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे 200 ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  (Maharashtra Government will Construct Oxygen Plant at 14 places)

कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात 3, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 2 तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.  (Maharashtra Government will Construct Oxygen Plant at 14 places)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक, शक्यतो ‘या’ ठिकाणी जाणे टाळाच !

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले

मुंबईकरांनो कोरोना लसीकरण करायचं? तुमच्या जवळचे कोणते केंद्र आज सुरु, कोणते बंद? पाहा यादी

Follow Us
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत....
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही.....
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला...
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला....
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...