AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. (Maharashtra govt shielding minister linked to woman's death: Chitra Wagh)

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा
चित्रा वाघ, भाजप नेत्या
| Updated on: Feb 26, 2021 | 2:06 PM
Share

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी वन मंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या 101 या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच त्या दिवशी 101 क्रमांकावरून झालेलं अरुण राठोडचं संभाषण जाहीर करून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Maharashtra govt shielding minister linked to woman’s death: Chitra Wagh)

चित्रा वाघ यांनी पुण्यात जाऊन पूजा चव्हाणने आत्महत्या केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत चर्चाही केली. आज त्यांनी मीडियाशी संवाद साधताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील अरुण राठोडने पोलिसांच्या 101 क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे कबुली दिली आहे. आत्महत्येच्या दिवशीच त्यानेही कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या कॉल रेकॉर्डची चौकशी करावी, पण पोलीस हे संपूर्ण प्रकरण झाकायचं काम करत आहे, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला.

पवार-ठाकरेंकडून अपेक्षा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता तरी त्यांनी या हत्याराला मंत्रिमंडळातून बाजूला करावं. आमचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यांना जर पुरावे दिले तर ते नक्कीच न्याय देतील. राजकारण बाजूला ठेवा. बाकी कोणाकडूनच आमची अपेक्षा नाही. बाकी चट्टेबट्टे सारखेच आहे. मुख्यमंत्री म्हणून महिलांच्या बाबतीत तुमची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळे तुमच्याकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत, असंही त्या म्हणाल्या.

कारवाई व्हावी

पूजा चव्हाण प्रकरणावर भाजप नेते विनोद तावडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात.असं असताना मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील अशा जबाबदार व्यक्तींकडून कारवाईची कृती सामान्य माणसाला अपेक्षित आहे, असं विनोद तावडे म्हणाले. सर्वसामान्य माणसाला आज राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल अस मला वाटतं, असं तावडे म्हणाले.

राठोडांचा राजीनामा घ्यावाच लागेल : प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. पूजा चव्हाण यांची आत्महत्या किंवा हत्या झाली आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तावेज उपलब्ध आहे,साक्षीदार आहे. चौकशी होत नाही म्हणून सरकारवर दबाव भाजपा आणत आहे. महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता एक राज्यशासक म्हणून ठाकरे बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आक्रमक आहे. पूजा चव्हाण मृत्यूचा छडा लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. संशयाची सुई संजय राठोड यांच्यावर आहे त्यामुळे राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व झाल्यास मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. (Maharashtra govt shielding minister linked to woman’s death: Chitra Wagh)

संबंधित बातम्या:

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत, पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाही, फडणवीस भडकले

‘मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना’, फडणवीसांकडून ठाकरे सरकारची खिल्ली 

(Maharashtra govt shielding minister linked to woman’s death: Chitra Wagh)

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.