AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगाव, कारवार, निपाणी ते सोडतील तर मग, तसा विचार करता येईल…, शरद पवारांनी सीमावादावर भूमिकाच मांडली…

कर्नाटकचे नेते, मंत्री उठसूट महाराष्ट्राविषयी नको ती मागणी करतात, त्याला जबाबदार येथील सत्ताधारी आणि केंद्रात बसलेली लोकंही जबाबदार आहेत.

बेळगाव, कारवार, निपाणी ते सोडतील तर मग, तसा विचार करता येईल..., शरद पवारांनी सीमावादावर भूमिकाच मांडली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 24, 2022 | 3:51 PM
Share

मु्ंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असतानाच बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनीही याबाबत ठोस भूमिका घेत त्यांनी सीमाभागातील या गावांसोबत आपण असल्याचा ठाम विश्वासही त्यांना देण्यात आला. या सीमावादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त करताना त्यांनी आपलीही भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांची मागणी केली.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री बोमई सांगलीतील त्या गावांची मागणी करत असतील तर आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव, कारवार, निपाणी यासह सीमाभागातील काही गावांची आम्हीपण मागणी करत आहोत.

ते जर आमच्या मागणी प्रमाणे बेळगाव, कारवार आणि निपाणी हे सोडणार असतील तर त्या गावांविषयी चर्चा करुन प्रश्न सोडवता येईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरू आहे. त्यातच काल बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांची मागणी केल्यानंतर शरद पवारांनी एक दिवस उशीराच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, कर्नाटकातील नेते, मंत्री सरळ उठतात आणि हवी तशी मागणी करतात. त्याला जबाबदार फक्त ते कर्नाटकातील नेते नाहीत तर त्याला येथील राज्यातील आणि केंद्रात सत्तेत असलेली लोकंही जबाबदार आहेत.

त्यामुळे त्यांनी चाळीस गावं मागण्याबद्दल काही मत नाही पण आमची गेल्या कित्येक वर्षांपासूनची जी मागणी आहे की, बेळगाव, कारवार, निपाणी ही गावं जर कर्नाटक सोडत असतील तर त्यांच्या कालच्या मागणीवर चर्चा करुन तोडगा काढता येईल असंही त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?