AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगाव, कारवार, निपाणी ते सोडतील तर मग, तसा विचार करता येईल…, शरद पवारांनी सीमावादावर भूमिकाच मांडली…

कर्नाटकचे नेते, मंत्री उठसूट महाराष्ट्राविषयी नको ती मागणी करतात, त्याला जबाबदार येथील सत्ताधारी आणि केंद्रात बसलेली लोकंही जबाबदार आहेत.

बेळगाव, कारवार, निपाणी ते सोडतील तर मग, तसा विचार करता येईल..., शरद पवारांनी सीमावादावर भूमिकाच मांडली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 24, 2022 | 3:51 PM
Share

मु्ंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असतानाच बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनीही याबाबत ठोस भूमिका घेत त्यांनी सीमाभागातील या गावांसोबत आपण असल्याचा ठाम विश्वासही त्यांना देण्यात आला. या सीमावादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त करताना त्यांनी आपलीही भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांची मागणी केली.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री बोमई सांगलीतील त्या गावांची मागणी करत असतील तर आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव, कारवार, निपाणी यासह सीमाभागातील काही गावांची आम्हीपण मागणी करत आहोत.

ते जर आमच्या मागणी प्रमाणे बेळगाव, कारवार आणि निपाणी हे सोडणार असतील तर त्या गावांविषयी चर्चा करुन प्रश्न सोडवता येईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरू आहे. त्यातच काल बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांची मागणी केल्यानंतर शरद पवारांनी एक दिवस उशीराच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, कर्नाटकातील नेते, मंत्री सरळ उठतात आणि हवी तशी मागणी करतात. त्याला जबाबदार फक्त ते कर्नाटकातील नेते नाहीत तर त्याला येथील राज्यातील आणि केंद्रात सत्तेत असलेली लोकंही जबाबदार आहेत.

त्यामुळे त्यांनी चाळीस गावं मागण्याबद्दल काही मत नाही पण आमची गेल्या कित्येक वर्षांपासूनची जी मागणी आहे की, बेळगाव, कारवार, निपाणी ही गावं जर कर्नाटक सोडत असतील तर त्यांच्या कालच्या मागणीवर चर्चा करुन तोडगा काढता येईल असंही त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश