AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा मला मारलं… एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी डिवचले

राज्यात सत्ताधारी महायुतीत अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे भाजप नेत्याची तक्रार केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

बाबा मला मारलं... एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी डिवचले
Uddhav Thackeray eknath shinde
| Updated on: Nov 20, 2025 | 2:03 PM
Share

राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सत्ताधारी महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार अमित शाहांकडे केल्याचे बोललं जात आहे. आता याबद्दल विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता याच मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील एक कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला. मी कार्यक्रमाची साईज बघत नाही. कामाची साईज बघतो. आयुष्यात चांगलं शिक्षण आणि शिक्षक मिळाले नाहीत तर काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… असे जे काही दिवटे निघाले त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेलं…

तुमच्या आमदारकीचा फंड फक्त शिक्षणासाठी वापरा. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर त्यांच्या नाड्या आवळल्या जातात हे आपण वाचतो. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवळण्याचा प्रकार सुरु झाला आहे. आजच तुम्ही पेपरमध्ये वाचलं असे तर त्यात लिहिलं आहे. बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेले होतं. ही लाचारी का आणि कशामुळे. जर त्यांना त्या वयात योग्य शिक्षण मिळालं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी

मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली. गेले ३-४ वर्ष महापालिकेत बाप कोण आहे तेच कळत नाही. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे आहेत. सामान्य जनतेकडे कोण लक्ष देत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहन आमदारांना केले.

Follow Us
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार