AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ, शेलारांचा दावा; पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला

या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पराभव अटळ असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणत पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे.

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ, शेलारांचा दावा; पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला
पालिकेच्या "दप्तर" दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे उत्तर द्या, विद्यार्थ्यांच्या साहित्यावरून आशिष शेलार आक्रमकImage Credit source: tv9
| Updated on: Jun 16, 2022 | 11:15 PM
Share

मुंबई : जसजशा विधान परिषदेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Parishad Election) जवळ येत आहेत, तस तसा सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने तिकडे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.  तर इकडे महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सावध पाऊलं टाकत आहे. दुपारच्या बैठकीनंतर भाजपने (BJP) आज पुन्हा संध्याकाळी खास विधान विधान परिषदेसाठी एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पराभव अटळ असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणत पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीनेही आपले सर्व मोठे नेते तसेच अनेक अपक्ष आमदार हे तातडीने मुंबईला बोलवले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीला चांगलीच रंगत येताना दिसत आहे.

आशिष शेलार यांची बैठकीनंतरची प्रतिक्रिया

आघाडीचा पराभव अटळ

विधान परिषद निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सर्व आमदार सदविवेक बुद्धीला स्मरून भाजपाला पुन्हा मतदान करतील. हा निकाल भाजपाच्या बाजूने लागेल. रणनिती आखताना योग्य आणि सावध पावले टाकतोय. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केलाय. तर नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे, काँग्रेस नेतृत्वास विनंती आहे, ठाण्यात त्यांना रुग्णालयात घेऊन जा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच नानांना पराभव दिसतोय, म्हणूनच ते उडाणटप्पू सारखे स्टेटमेंट करत आहेत. म्हणूनच मला बोलावे लागत आहे. मित्र पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

आघाडीचे आमदारही आम्हाला मदत करतील

तर विधान परिषदेच्या तयारीबाबत बोलताना ते म्हणाले, सर्व सहकारी सोबत काम करतोय.  राज्यसभेत महाविकास आघाडीतील आमदारांनी छातीवर हात ठेवून मत दिले नाही हे सांगायचे धाडस ते करणार नाहीत, अपक्षच नव्हे तर महाविकास आघाडीचे आमदारही यावेळी आम्हाला मदत करतील, असे सूचक विधानही आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोलेबाजी केली आहे. संजय राऊत मित्र पक्षांच्या आमदारांना घोडेबाजार बोलले, शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढली आहे. तर महाविकास आघाडीतही विचका झालेला आहे, त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास यावेळी शेलारांनी व्यक्त केला आहे. आता महाविकास आघाडी भाजपचे हे आव्हान कसं थोपवणार? हे तर निवडणुकीचे निकालच सांगतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.