AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ, शेलारांचा दावा; पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला

या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पराभव अटळ असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणत पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे.

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ, शेलारांचा दावा; पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला
पालिकेच्या "दप्तर" दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे उत्तर द्या, विद्यार्थ्यांच्या साहित्यावरून आशिष शेलार आक्रमकImage Credit source: tv9
| Updated on: Jun 16, 2022 | 11:15 PM
Share

मुंबई : जसजशा विधान परिषदेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Parishad Election) जवळ येत आहेत, तस तसा सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने तिकडे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.  तर इकडे महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सावध पाऊलं टाकत आहे. दुपारच्या बैठकीनंतर भाजपने (BJP) आज पुन्हा संध्याकाळी खास विधान विधान परिषदेसाठी एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पराभव अटळ असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणत पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीनेही आपले सर्व मोठे नेते तसेच अनेक अपक्ष आमदार हे तातडीने मुंबईला बोलवले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीला चांगलीच रंगत येताना दिसत आहे.

आशिष शेलार यांची बैठकीनंतरची प्रतिक्रिया

आघाडीचा पराभव अटळ

विधान परिषद निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सर्व आमदार सदविवेक बुद्धीला स्मरून भाजपाला पुन्हा मतदान करतील. हा निकाल भाजपाच्या बाजूने लागेल. रणनिती आखताना योग्य आणि सावध पावले टाकतोय. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केलाय. तर नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे, काँग्रेस नेतृत्वास विनंती आहे, ठाण्यात त्यांना रुग्णालयात घेऊन जा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच नानांना पराभव दिसतोय, म्हणूनच ते उडाणटप्पू सारखे स्टेटमेंट करत आहेत. म्हणूनच मला बोलावे लागत आहे. मित्र पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

आघाडीचे आमदारही आम्हाला मदत करतील

तर विधान परिषदेच्या तयारीबाबत बोलताना ते म्हणाले, सर्व सहकारी सोबत काम करतोय.  राज्यसभेत महाविकास आघाडीतील आमदारांनी छातीवर हात ठेवून मत दिले नाही हे सांगायचे धाडस ते करणार नाहीत, अपक्षच नव्हे तर महाविकास आघाडीचे आमदारही यावेळी आम्हाला मदत करतील, असे सूचक विधानही आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोलेबाजी केली आहे. संजय राऊत मित्र पक्षांच्या आमदारांना घोडेबाजार बोलले, शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढली आहे. तर महाविकास आघाडीतही विचका झालेला आहे, त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास यावेळी शेलारांनी व्यक्त केला आहे. आता महाविकास आघाडी भाजपचे हे आव्हान कसं थोपवणार? हे तर निवडणुकीचे निकालच सांगतील.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.