AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report | हवेत गारवा, पण, पाऊस नाही; वाचा राज्याचं संपूर्ण ‘हवामान’

आज राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण राहणार नसून कुठेही पावसाच्या सरी कोसळणार नाही.

Weather Report | हवेत गारवा, पण, पाऊस नाही; वाचा राज्याचं संपूर्ण 'हवामान'
| Updated on: Jan 11, 2021 | 10:11 AM
Share

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे हैराण झालेल्या (Maharashtra Weather Report) राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. आज राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण राहणार नसून कुठेही पावसाच्या सरी कोसळणार नाही. मात्र, काही ठिकाणी हवेत गारवा राहणार आहे. तर, राज्यातील अनेक भागात कडक ऊन पडणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे (Maharashtra Weather Report).

राज्यात कुठे कसं हवामान राहणार?

गेल्या आठवड्याभरात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. 9 जानेवारीपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हावामान विभागाने वर्तवला होता. मात्र, आज राज्यात कडक ऊन पडलं आहे. मुंबईसह उपनगरात हवामान आकाश स्वच्छ राहणार आहे. आज मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे, मुंबईत सध्या 30 अंश सेल्सिअस तामपानाची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभर वातावरणात कुठलाही बदल होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मुंबईत शनिवारी रात्री ते रविवारच्या सकाळपर्यंत हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. मात्र, त्यानंतर मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.

राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी महत्त्वाच्या शहरांमध्येही आज पावसाचा अंदाज नाही. कालपर्यंत जिथे ढगाळ वातावरण आणि पाऊस होता तिथे आज कडक ऊन पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज्यातील थंडीलाही ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे (Maharashtra Weather Report).

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने राज्यातील जनतेला हैराण केलं होतं. तसेच, अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी भाजपने केली आहे (Maharashtra Weather Report).

काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला

मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.

Maharashtra Weather Report

संबंधित बातम्या :

Weather Report | शनिवारी पाऊस, मंगळवारी थंडी, बाहेर पडण्याआधी हा हवामान रिपोर्ट वाचा

Weather Alert | मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसामुळे थंडी गायब

Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.