“ठाकरेंनी अडीच वर्षे नेभळट सरकार चालवलं” भाजप नेत्यांनी मविआचा सगळा कारभारच मांडला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय समित्यांशी, मंत्रिमंडळाशी भेटीगाठी आणि चर्चा केली जात आहे.

ठाकरेंनी अडीच वर्षे नेभळट सरकार चालवलं भाजप नेत्यांनी मविआचा सगळा कारभारच मांडला
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 9:51 PM

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे महापुरुषांचा अवमान, सीमाभागातील गावांना महाराष्ट्रातून फोडण्याचा कट, महाराष्ट्रातून उद्योगांची पळवापळवी, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना आधार देण्यात आलेलं अपयश, याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र अभिमानींचा 17 डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले आहे.

त्याबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना सांगितले की, ज्या महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात जनतेची, शेतकऱ्यांची कामं केली नाहीत.

त्या नेभळट ठाकरे सरकारने शिंदे-भाजप सरकारवर टीका करू नये असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला. महाविकास आघाडीचे सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेले सरकार हे नेभळट सरकार होते.

त्यामुळे त्यांनी आता चालणाऱ्या आणि लोकांची कामं करणाऱ्या शिंदे-फडणवस सरकारवर टीका करण्याचे काम चालू केले आहे.

त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आडून राजकारण चालू करण्याचं काम हे विरोधक करत असल्याचा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा प्रयत्न भाजपकडून कधीही केला जाणार नाही.

छत्रपतींचा आदर काल, आज आणि उद्याही आदर राखला जाईलच त्याबद्दल दुमत नाही मात्र ठाकरे गटाकडून छत्रपतींचे नाव पुढं करून त्यांच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमावादावर बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय समित्यांशी, मंत्रिमंडळाशी भेटीगाठी आणि चर्चा केली जात आहे.

सीमावादाचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन सोडवणार का असा टोला लगावल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच पलटवार करत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी टीका, टिप्पणी आणि टोमणे न मारता जरा याकडे स्पष्टपणे पाहावे.

कारण सध्याचं राज्यातील दोन्ही नेतृत्व ही सामंजस्य असून त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून काम करणं चालूच असल्याचं त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.