AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE: मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू झालं आहे. मात्र आता त्याच्या कायद्याच्या कसोटीबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकणं मुश्किल आहे. आधीच्या दोन आयोगाबद्दल सरकारने […]

EXCLUSIVE: मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

मुंबई: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू झालं आहे. मात्र आता त्याच्या कायद्याच्या कसोटीबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकणं मुश्किल आहे. आधीच्या दोन आयोगाबद्दल सरकारने काय कार्यवाही केली ते समजत नाही. आधीच्या दोन्ही आयोगानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलं होतं. त्यामुळं फक्त सध्याच्या गायकवाड आयोगानं आरक्षणाबाबत शिफारस केली आहे. सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण लावून दिलं आहे”

याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी  तीन आयोग आले, ते का स्वीकारले गेले नाहीत याची ठोस कारणं दिलेली नाही. त्यामुळं दोन विरुद्ध एक अशा मतानं हे आरक्षण टिकेल असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेनुसार राज्य आयोगानं केंद्रीय आयोगाचं मत विचारात घ्यायला हवं होतं, ते घेतलेलं दिसत नाही. त्यामुळं कायदेशीर आठकाठी निर्माण होऊ शकते. सामाजिक, शैक्षणिक, मागासलेला प्रवर्ग अशी ओळख सरकारनं दिली आहे. त्यामुळं मंडल यादी आणि ही यादी एकच होऊन 43 टक्क्याच्या आरक्षणाबाबत ओबीसी आक्रमक होऊ शकतो. सरकारनं यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळं सरकारच्या बिलामुळं राज्यात शांतता राहिल असं वाटत नाही. अहवालाच्या शिफारशींबद्दल कोर्टच निर्णय घेऊ शकतं, असंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षण लागू

दरम्यान, आजपासून मराठा आरक्षण लागू झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 डिसेंबरला जल्लोष करा असं मराठा समाजाला सांगितलं होतं. त्यानुसार सरकारने मराठा आरक्षण लागू केलं. मराठा आरक्षणाचा शासन आदेश आज जारी झाला. आजपासून नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असेल.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.