AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रो 6 : जोगेश्वरीतील प्रकल्पबाधितांचं जवळच पुनर्वसन करा; आमदार रवींद्र वायकरांची मागणी

मेट्रो 6 मुळे प्रकल्पबाधित होणार्‍या जोगेश्‍वरीतील कुटुंबांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर एमएमआरडीएकडे केली आहे.

मेट्रो 6 : जोगेश्वरीतील प्रकल्पबाधितांचं जवळच पुनर्वसन करा; आमदार रवींद्र वायकरांची मागणी
रवींद्र वायकर, शिवसेना नेते
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 10, 2021 | 7:05 PM
Share

मुंबई : मेट्रो मार्गिका 6 च्या कामामुळे प्रकल्पबाधित होणार्‍या जोगेश्‍वरी पूर्वेकडील बांद्रेकरवाडी येथील प्रकल्पबाधितांची पात्रता निश्‍चित करुन त्यांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, असे पत्र जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांना पाठविले आहे. (Metro 6 affected Jogeshwari people should Rehabilite nearby; Ravindra Waikar Demands)

जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्त्यावरुन मेट्रो मार्गिका 6 ही स्वामी समर्थ नगर अंधेरी (पश्‍चिम) ते कांजुरमार्ग अशी प्रस्तावित आहे. सध्या याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे येथील सुमारे 70 ते 75 कुटुंबे प्रकल्पबाधित होत आहेत. सुरूवातील याचे सर्वेक्षण एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील पात्र असलेल्या झोपड्यांमधील काही प्रकल्पबाधितांची एमएमआरडीएने सोडत काढली होती. या सोडतीनंतर काही प्रकल्पबाधितांकडून चकाला येथील पुनर्वसन इमारत क्रमांक बी-2/सी मधील सदनिका वितरीत करणेसाठी त्यांच्याकडून बंधपत्र ही लिहून घेण्यात आले.

मात्र त्याचे प्रथम पुनर्वसन होण्याआधीच त्यांना एमएमआरडीएकडून नोटीसा पाठविण्यात आल्या. यातील काही जण पहिल्या मजल्यावर राहत असल्याने त्यांना अपात्रही करण्यात आले. ज्या प्राधिकरणाने येथील प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण करुन त्यांना पात्र ठरवून पुनर्वसनाची तयारी केली अशा प्रकल्पबाधितांना सदनिकेचे वाटप न करता त्याच प्राधिकरणाने आता अपात्र ठरविले ठरविणे, हे एक प्रकारे प्रकल्पबाधितांवर अन्याय करण्यासारखे आहे.

ज्या प्रकल्पबाधितांना अपात्र ठरविण्यात आले आहे ते सर्व मागील 38 ते 40 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्यांचे पात्रता सिद्ध करणारे 1983 च्या आधीचे शासकीय पुरावे, 1995 च्या मतदार यादीत नावे असतानाही या प्रकल्पबाधितांना अपात्र ठरवून त्यांना नाटीस पाठविणे उचित नाही. येथील प्रकल्पबाधित विकासाला मदत करण्यास तयार असतानाही यातील अनेकांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडून सध्याच्या ठिकाणापासून दूरवर केले जात आहे.  यामुळे येथील प्रकल्पबाधितांमध्ये असंतोषाचे वातवरण असल्याचे वायकर यांनी एमएमआरडीएच्या आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

त्यामुळे एमएमआरडीए यंत्रणेमार्फत पूर्वी काढण्यात आलेल्या व बंधपत्र स्वीकारलेल्या प्रकल्पबाधितांचे त्यांच्या सोडतीनुसार सदनिकांचा ताबा देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा. तसेच येथील उर्वरित प्रकल्पबाधितांचे सध्या ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणापासून जवळच पुनर्वसन करण्यात यावे, असे रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

इतर बातम्या

Mumbai Local : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा, उद्यापासून रेल्वे स्थानकांवर पास मिळणार, वाचा संपूर्ण प्रक्रिया

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

(Metro 6 affected Jogeshwari people should Rehabilite nearby; Ravindra Waikar Demands)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली