AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काँग्रेस-राष्ट्रवादी नावालाही शिल्लक नसेल” ग्रामपंचायत निवडणुकीबाबत या नेत्याचा आत्मविश्वास…

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पक्षाला त्यांनी राजकीय स्पर्धेत धरले नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी नावालाही शिल्लक नसेल ग्रामपंचायत निवडणुकीबाबत या नेत्याचा आत्मविश्वास...
| Updated on: Dec 19, 2022 | 12:43 AM
Share

जळगावः राज्यात आज अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनीही आपापल्या पक्षासाठी जोरदार फिल्डिंग लावून ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली होती. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाविषयी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप आणि शिंदे गटाला 70 ते 75 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी आज मोठ्या चुरशीने निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे झालेल्या निवडणुकांवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी राज्यात ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यानी जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींबाबत बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर राज्यातही हीच परिस्थिती असणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी विश्वास व्यक्त करून दाखवला आहे. त्यामुळे आता राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पक्षाला त्यांनी राजकीय स्पर्धेत धरले नाही. काँग्रेस राष्ट्रवादीविषयी बोलताना त्यांनी हे दोन्ही पक्ष कुठे नावालाही उरणार नाहीत असं त्यांनी सांगितले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपविषयी व्यक्त केलेला विश्वास आता कितपत बरोबर ठरतो ते आता निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किती यश मिळवते ते आता येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.