AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळी अधिवेशनानंतर हे तीन मंत्री असणार कर्नाटक दौऱ्यावर, मराठी माणसांच्या हिताचा घेणार निर्णय

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर दोन्ही राज्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

हिवाळी अधिवेशनानंतर हे तीन मंत्री असणार कर्नाटक दौऱ्यावर, मराठी माणसांच्या हिताचा घेणार निर्णय
| Updated on: Dec 19, 2022 | 12:02 AM
Share

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर सीमावादावरून जोरदार ठिणगी पडली होती. महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद वाढल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हा वाद सोडवण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची भेटही घेतली मात्र तरीही आता हा वाद आणखी विकोपाला गेला असल्याने आता मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत, हिवाळी अधिवेशनानंतर समन्वयक मंत्री म्हणून मी , चंद्रकांत पाटील आणि धैर्यशील माने बेळगा दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की, सीमाभागातील मराठीजनांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेणार आहे.

सीमाभागातील बंधू-भगिनींशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर उच्चाधिकार समितीचे समन्वयक मंत्री म्हणून मी आणि चंद्रकांत पाटील जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.त्यामुळे बेळगाव आणि सीमाभागातील नागरिकांना आशा निर्माण झाल्या आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर दोन्ही राज्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यामुळेच सीमावाद पेटला होता. त्यानंतर केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी वाढल्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली.

त्यावेळी दोन्ही राज्यातील लोकप्रतिनिधींना सामंजस्यपणे सांगण्यात आले. तरीही आता कर्नाटककडून आडमुठेपणाची भूमिका घेतल महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावमध्ये येऊ नये असे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

तसेच धैर्यशील माने यांच्याही पत्राला मराठी, हिंदीतून उत्तर न देता कन्नड आणि इंग्रजीमधून कर्नाटक प्रशासनाकडून उत्तर देण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.