‘युपी-बिहार पेक्षाही महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलंय’, शिवाजी पार्कातील सभेआधी राज ठाकरे बरसले

महाराष्ट्राची आजची राजकीय परिस्थिती खूप घाण आणि गलिच्छ आहे. महाराष्ट्रातलं आताचं राजकारण पाहिलं तर मला असं वाटतं की मी राजकारणासाठी मिसफीट आहे, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी आज केलंय.

'युपी-बिहार पेक्षाही महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलंय', शिवाजी पार्कातील सभेआधी राज ठाकरे बरसले
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:34 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज एका मुलाखतीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक भूमिका मांडली आहे. राज्यातील राजकारण जे घडतंय ते आवरलं पाहिजे. नाहीतर उत्तर प्रदेश (UP) किंवा बिहार (Bihar) सारखी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी राज्यातील तरुण वर्गाला राज कारणात येण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.

“एक मोठा वर्ग राजकारणाच्या बाहेर गेलाय. हा वर्ग इथल्या परिस्थितीला कंटाळून दुसऱ्या देशांमध्ये चांगल्या नोकरी पाहून स्थायिक झालाय. त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही. पण माझ्या मनात आहे की, त्यांनी परत यावं. या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत. सांभाळल्या पाहिजेत. नाहीतर हे प्रकरण हाताबाहेर जाणार. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही उत्तर प्रदेश, बिहार सारखी होईल. मला त्याचीच खूप जास्त भीती वाटते”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्रातलं आताचं राजकारण पाहिलं तर…’

“महाराष्ट्रातलं आताचं राजकारण पाहिलं तर मला असं वाटतं की मी राजकारणासाठी मिसफीट आहे. मला सध्याच्या परिस्थितीला पाहून व्यंगचित्रकार म्हणून काहीच बोलावसं वाटत नाही. महाराष्ट्राची आजची राजकीय परिस्थिती खूप घाण आणि गलिच्छ आहे”, असं रोखठोक मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी यावेळी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आज सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यांवर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

“जे हिंदुत्व-हिंदुत्व बोलतात. त्यांनी मला एकदा त्यांचे हिंदुत्व सांगावे. सौदीमध्ये भोंगे बंद होऊ शकतात तर आपल्याकडे मोदी भोंगे बंद करू का शकत नाहीत? उद्या सभा आहेत. त्यात मी बोलेनच त्यामध्ये अजून कदाचित काहीतरी जास्तीत येईल”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर उद्या सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं आजच स्पष्ट केलंय.

“तुम्ही गीतकार जावेद अख्तर यांचे पाकिस्तानमधील स्टेटमेंट ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्या लता मंगेशकर यांना मानत नाहीत तर आम्ही का तुमच्या कलाकारांना मानू? या देशात इतकं टॅलेंट भरलेले आहे. तर ती पाकिस्तानी नरडी आपल्याला हवेत कशाला?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.