AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजींचं नाणं दाखवूनचं शिवसेना निवडून आली, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदीजींचं नाणं दाखवूनच शिवसेना निवडून आली.

मोदीजींचं नाणं दाखवूनचं शिवसेना निवडून आली, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 09, 2022 | 4:58 PM
Share

मुंबई : नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं, संपलेलं नाण झालंय, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. बाळासाहेबांसारखं खणखणीत नाणं आपल्याकडं आहे. फुटलेले खासदार म्हणाले होते, पुढच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या नावाचा वापर करावा लागेल. मग, आता तुम्हाला बाळासाहेबांच्या नावाचा वापर का करावा लागतो. आताची निवडणूक शेवटची निवडणूक (Election) आहे. हा निखाऱ्यावरचा प्रवास आहे. यात तुम्ही माझ्याबरोबर आहात. असं मत उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कान्फरन्सवर संवाद साधताना व्यक्त केलं. तसेच शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदीजींचं नाणं दाखवूनच शिवसेना निवडून आली. त्यामुळं बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील. देशामध्ये मोदीजींचं नाण चालतचं राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मागच्या वेळी मी म्हटलं प्रत्येक निवडणूक शेवटची समजूनच लढतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांना फार वाईट वाटलं होतं. त्यांनी माझी शेवटची निवडणूक असल्याचं म्हटलं होतं. माझा पक्ष आपलं काम करतो. देशात राज्यात आमचं सरकार आहे. जनतेची सेवा करणं आमचं काम आहे.

नाशिकची घटना दुर्दैवी आहे. अशा घटना घडणार नाही, यासाठी प्रयत्न करू.

भाजपचा विचार, आचार आतापर्यंत कार्यपद्धती, भविष्याचा विचार या सर्व पद्धतीची चर्चा अशा बैठकांमध्ये होते. मोदीजींनी गरिबांच्या कल्याणाचा अजेंडा राबविली. गरिबांना लोकशाहीशी जोडलं आहे. विकासाच्या तंत्राशी जोडलेलं आहे.

पुढच्या निवडणुकीचा रोड मॅप तयार केला. पदाधिकाऱ्यांना सर्वांगाण प्रशिक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुसाठी पदाधिकाऱ्यांना तयार केलं जातंय. त्यासाठी भाजप बैठकांचं आयोजन करतं.

निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. जेव्हा वाद निर्माण होतात, तेव्हा निवडणूक आयोग अशाप्रकारचा निर्णय घेते. यापूर्वी असं झालेलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.