AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र भाजपमध्ये भूकंप, मोहित कंबोज यांचा थेट केंद्रीय नेतृत्वाला सवाल, नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्रात भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे भाजप पक्षात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत थेट उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यानंतर मोहित कंबोज यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सवाल केला आहे.

महाराष्ट्र भाजपमध्ये भूकंप, मोहित कंबोज यांचा थेट केंद्रीय नेतृत्वाला सवाल, नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्र भाजपमध्ये भूकंप, मोहित कंबोज यांचा थेट केंद्रीय नेतृत्वाला सवाल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 05, 2024 | 5:54 PM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. हा पराभव देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना खूप जिव्हारी लागला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्लीतल्या पक्ष श्रेष्ठींकडे आपल्याला पक्ष संघटना वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती भर पत्रकार परिषदेत केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा भूकंप आला आहे. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली जात आहे. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजप नेते मोहित कंबोज यांनी थेट पक्षाच्या दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांना सवाल केले आहेत.

“भाजप महाराष्ट्र आणि भाजप मुंबई यांनी रिअॅलिटी चेक करण्याची गरज आहे. या संपूर्ण पराभवाची जबाबदारी कोणाची?”, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. “फक्त एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या चक्करमध्ये पक्षाचं नुकसान झालं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनीही पराभवात जबाबदारी निश्चित करावी”, असं मोहित कंबोज म्हणाले आहेत.

मोहित कंबोज नेमकं कोणत्या व्यक्तीबद्दल बोलले?

मोहित कंबोज यांच्या एका वक्तव्याचा अर्थ महत्त्वाचा आहे. “फक्त एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या चक्करमध्ये पक्षाचं नुकसान झालं”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य कदाचित ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणूक ही पहिली मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालाय. त्यामुळेच मोहित कंबोज यांनी संबंधित व्यक्त केल्याची चर्चा आहे.

मंगलप्रभात लोढा यांचं फडणवीसांना आवाहन

दरम्यान, भाजपचे नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. “लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्राचे नेतृत्व केले, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपला मोठा आधार आहे. सध्याच्या राज्य सरकारमध्ये आपली महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या नेतृत्वात अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील हा पराजय आपल्या एकट्याची जबाबदारी नसून, आम्हा सर्वांची देखील आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण राजीनामा देऊ नये. सरकारमध्ये राहून आम्हा सर्वांचे मार्गदर्शन करावे आणि भाजपा कार्यकर्त्यांचे नेतृत्व करावे”, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

Follow Us
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल