AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाकाळात केलेल्या कामाचं कौतुक, मुंबई मनपा आयुक्तांचा स्पीक इंडिया संस्थेकडून गौरव

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी कोरोना या साथ रोगाच्या काळात संघ भावनेने दिवस-रात्र काम करुन मुंबईकरांची सेवा करीत आहेत.

कोरोनाकाळात केलेल्या कामाचं कौतुक, मुंबई मनपा आयुक्तांचा स्पीक इंडिया संस्थेकडून गौरव
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई : महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी कोरोना या साथ रोगाच्या काळात संघ भावनेने दिवस-रात्र काम करुन मुंबईकरांची सेवा करीत आहेत. याच अनुषंगाने ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा ‘स्पीक इंडिया’ या प्रथितयश संस्थेद्वारे नुकताच विशेष गौरव करण्यात आला आहे. (Mumbai : BMC Commissioner Iqbal Singh Chahal gets ‘Excellence In Crisis Management’ award for handling Covid-19 crisis)

या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना महानगरपालिका आयुक्तांनी सदर पुरस्कार आणि गौरव हा खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे नमूद करत पुरस्कार त्यांना व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संघ भावनेला समर्पित केला आहे.

भारतातील प्रशासकीय सेवेत वर्षभरात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ‘स्पीक इंडिया’ या संस्थेद्वारे दरवर्षी गौरविले जाते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱया भारतीय प्रशासकीय सेवेतील 10 अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. या अंतर्गत ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांचा गौरव करण्यात आला आहे.

यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांचा समावेश होता. या निवड समितीने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

इतर बातम्या

Maharashtra landslide death toll : राज्यात आतापर्यंत 129 मृत्यू, तळीये दुर्घटनेतील मृतांचे बळी वाढतेच, थोरातांकडून आकडा वाढण्याची भीती

महाराष्ट्रात पावसाचं थैमान, राज्य संकटात, तातडीने योग्य ती मदत पोहोचवा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र

ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, तळीये गावात कालच मदत पोहोचली होती: उद्धव ठाकरे

(Mumbai : BMC Commissioner Iqbal Singh Chahal gets ‘Excellence In Crisis Management’ award for handling Covid-19 crisis)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.