AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, कुठे, कधी, किती टक्के पाणीकपात?

मुंबईवर पाणीकपातीचे संकट! धरणांतील साठा केवळ २७ टक्क्यांवर आल्याने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, कुठे, कधी, किती टक्के पाणीकपात?
mumbai water cut
| Updated on: Apr 29, 2026 | 8:30 AM
Share

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने येत्या १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यासोबतच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळेच मुंबईकरांवर ही परिस्थिती ओढवली असून पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

पाणीसाठा केवळ २७ टक्क्यांवर

मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, मोडक सागर, विहार आणि तुळशी अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये केवळ २७.०७ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा लक्षणीयरीत्या कमी असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कपातीचा निर्णय घेतला आहे.

दैनंदिन पुरवठ्यात मोठी घट

मुंबईला दररोज साधारणपणे ३,८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साधारण १० टक्के कपात लागू झाल्यानंतर दररोज सुमारे ३८५ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळणार आहे. याचा सर्वाधिक फटका उंच इमारती आणि डोंगराळ भागातील वस्त्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावल्याने महापालिकेने राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव कोट्यातून अतिरिक्त पाणी मिळावे, अशी विनंती पालिकेने केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केल्यास मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

धरणाचे नाव पाणीसाठ्याची स्थिती (अंदाजे टक्केवारी)
विहार ४८%
तुळशी ४३.६७%
अप्पर वैतरणा ४०.३५%
तानसा ३९.१७%
भातसा ३७.९३%
मोडक सागर ३४.५५%
मध्य वैतरणा ३२.९६%
एकूण सरासरी साठा २८.३५%

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. बागांना पाणी देताना किंवा गाड्या धुताना पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या टाक्यांमधील गळती तपासावी. पावसाळा सुरू होण्यास अजून किमान सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?