AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, कुठे, कधी, किती टक्के पाणीकपात?

मुंबईवर पाणीकपातीचे संकट! धरणांतील साठा केवळ २७ टक्क्यांवर आल्याने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, कुठे, कधी, किती टक्के पाणीकपात?
mumbai water cut
| Updated on: Apr 29, 2026 | 8:30 AM
Share

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने येत्या १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यासोबतच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळेच मुंबईकरांवर ही परिस्थिती ओढवली असून पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

पाणीसाठा केवळ २७ टक्क्यांवर

मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, मोडक सागर, विहार आणि तुळशी अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये केवळ २७.०७ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा लक्षणीयरीत्या कमी असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कपातीचा निर्णय घेतला आहे.

दैनंदिन पुरवठ्यात मोठी घट

मुंबईला दररोज साधारणपणे ३,८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साधारण १० टक्के कपात लागू झाल्यानंतर दररोज सुमारे ३८५ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळणार आहे. याचा सर्वाधिक फटका उंच इमारती आणि डोंगराळ भागातील वस्त्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावल्याने महापालिकेने राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव कोट्यातून अतिरिक्त पाणी मिळावे, अशी विनंती पालिकेने केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केल्यास मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

धरणाचे नाव पाणीसाठ्याची स्थिती (अंदाजे टक्केवारी)
विहार ४८%
तुळशी ४३.६७%
अप्पर वैतरणा ४०.३५%
तानसा ३९.१७%
भातसा ३७.९३%
मोडक सागर ३४.५५%
मध्य वैतरणा ३२.९६%
एकूण सरासरी साठा २८.३५%

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. बागांना पाणी देताना किंवा गाड्या धुताना पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या टाक्यांमधील गळती तपासावी. पावसाळा सुरू होण्यास अजून किमान सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच