AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाडकी बहिण’ योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय; आता बँकांना…

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना' सध्या लोकप्रिय ठरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. अशातच लाभार्थ्यांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याने मोठा निर्णय घेतलाय. वाचा सविस्तर...

'लाडकी बहिण' योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय; आता बँकांना...
लाडकी बहिण योजनेबाबत मोठा निर्णयImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 08, 2024 | 10:34 AM
Share

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासन् तास रांगेत उभ्या राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसलं. फॉर्म भरलेल्या पैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप बाकी आहे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. बँकेकडूनच लाभार्थ्यी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

नेमकं काय घडलं?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ चा अनेक महिलांना लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. महिला लाभार्थ्यांचे पैस कापले जाऊ नयेत, यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून बँकांशी संवाद साधला जाणार आहे. या बँकांशी पत्रव्यवहार करण्याची तयारीही महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ काय आहे?

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं धोरण आणलं आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ शिंदे सरकारने घोषित केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमाह 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. याची सुरुवातही झाली आहे. पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर